Wednesday, June 11, 2014

हि गोष्ट १९८३, ८४ मध्ये माझ्या आजोबांसोबत घडली होती

हि गोष्ट १९८३, ८४ मध्ये माझ्या आजोबांसोबत घडली होती . काल वडिलांबरोबर गप्पा मारता मारता त्यांनीच हि गोष्ट मला सांगितली . माझे आजोबा म्हणजे निडर व्यक्तिमत्व आणि गावाला राहत असल्यामुळे भीती हि त्यांना कधी वाटलीच नाही. दररोज रात्री जेवल्यानंतर शतपावली करणे हा त्यांचा नित्य नियम . त्याकाळी गावी अशी जास्त घर नव्हती . आणि आमच गाव एकदम सुमुद्र किनार्याला लागुनच होत . त्यामुळे रात्री वाहणाऱ्या थंड वार्याची मज घेण्यासाठी आणि शरीराला थोडासा व्यायाम देण्यासाठी आजोबा दररोज निघत . ते एकटेच शतपावली साठी जात कारण समुद्राला लागुनच स्मशान होते त्यामुळे रात्री तिथे जायला खूप जण घाबरत पण आजोबांना त्यावर विश्वास नव्हता . तर झाले असे त्या दिवशी जेवण करून आजोबा निघाले . आणि नेमकी त्याच दिवशी अमावस्या सुधा होती पण याचा त्यांच्यावर काहीही परिणाम नव्हता . आणि सकाळीच गावातील त्यांचा जुना मित्र वारला होता . त्याचाच विचार करत करत ते चालत होते . चालता चालता त्यांच्या लक्षात आले कि आज पण खूप पुढे आलो आहोत . त्यांनी घड्याळात बघितले रात्रीचे १२ वाजून गेले होते . एवढा उशीर ते केव्हाच चालले नव्हते म्हणून त्यांनी परतीचा रस्ता पकडला . अंधार खूप होता ते जशे स्मशाना जवळ पोहचले . तस त्यांना काही तरी हालचाल जाणवली . त्यांनी जरा जवळ जावून पाहावे असा विचार केला . म्हणून एका झाडाच्या मागे लपत ते पाहू लागले . त्यांनी पहिले कि ३ स्त्रिया कसले तरी मंत्र पठण करत आहेत . आणि ते मंत्र सुधा फार भयानक होते. इतकी वर्ष कशाला हि न भिणारे आजोबा आता मात्र घाबरले . आणि इतक्यात त्यांना शिंक आली . त्या आवाजाने त्या स्त्रियांचे लक्ष त्यांच्यावर गेले . त्यांनी एकदम भयानक आवाजात विचारले कोण आहे रे तिकडे बाहेर ये नाही तर तुझ काही खर नाही . आजोबाना संमोहित झाल्यासारखे झाडाच्या मागून बाहेर आले . आणि त्या बायका जिथे बसल्या होत्या तिथे जावून उभे राहिले . आणि आता त्या बायकांचा चेहरा त्यांना स्पष्ट दिसत होता . ते त्यांना ओळखत होते कारण त्या गावात राहणार्याच बायका होत्या . ज्या अघोरी विद्या शिकत होत्या. आजोबाना पाहून त्या म्हणाल्या कि तू आता आम्हाला पाहिलं आहेस . आता तुला जाऊ देणार नाही मंत्राने तुला इथेच मृत्यू देणार आम्ही . हे ऐकून आजोबा अजून घाबरले . व म्हणाले मला जाऊद्या इथून मी तुमच्या बद्दल कोणालाच सांगणार नाही . हे ऐकून त्या बायका मोठमोठ्याने हसू लागल्या . त्या म्हणाल्या आम्हाला वाचन दे कि तू आमच्या बद्दल कोणालाच सांगणार नाहीस म्हणून . आजोबांनी त्यांना वाचन दिले त्या म्हणाल्या हे बघ जर तू तुझे वाचन मोडलेस तर तुझ्या संपूर्ण कुटुंबावर आम्ही पिशाच्च आणि प्रेत आत्मे पाठवू आणि तुझे संपूर्ण कुटुंब संपवू . हे ऐकून आजोबा अजून घाबरले आणि त्यांनी त्यांना वाचन दिले . पण तेवढ्यात त्यातील एक स्त्री म्हणाली कि तू आमची साधना भंग केलीस . आता आमची साधना पूर्ण होई पर्यंत तुला इथेच बसावे लागेल आणि आम्ही जे सांगतो ते करावे लागेल . आजोबांनी मान डोलावली . मग त्या स्त्रिया त्यांना घेवून समुद्र किनारयावर गेल्या . आणि त्यांनी शरीरावरचे सगळे कपडे काढले आणि नग्न अवस्थेत त्या आत शिरल्या काही वेळाने . त्या तशाच नग्न अवस्थेत बाहेर आल्या पण त्यांच्या हातात एक प्रेत होत . ते प्रेत घेऊन त्या सगळ्या आणि आजोबा जिथे साधना चालली हुती त्या स्मशान जवळ गेले . आजोबांनी प्रेताकडे पहिले आणि त्यांची बोबडीच वळली कारण सकाळी त्यांचा जो मित्र वारला होता त्याचेच प्रेत होते ते . बायकांनी प्रेताचे तुकडे केले आणि एखाद्या जनावरासारखे त्या ते प्रेत खाऊ लागल्या . साधना संपन्न झाली . त्यांनी पुन्हा आजोबाना वाचनाची आठवण करून दिली आणि जाण्यास सांगितले . आजोबांनी तिथून धूम ठोकली ते थेट घरीच . आजी त्यांची वाट पाहत बसली होती . तिने विचारपूस केली कि उशीर का झाला इतका तेव्हा ते काहीच बोलले नाहीत . पण रात्री त्यांनी झालेली सगळी हकीकत आजीला सांगितली . पण त्या ३ स्त्रिया कोण आहेत त्यांची नाव सांगितली नाहीत . काही महिन्यांनी गावातील एका स्त्रीचा जी आजीची मैत्रीण होती तिचा गूढ रित्या मृत्यू झाला . तेव्हा आजोबा आजीला म्हणाले कि एका चांडाळणीचा अंत झाला आता फक्त २ बाकी आहेत तेव्हा आजी समजली कि आजोबा कोणा बद्दल बोलत आहेत . काही वर्षांनी अघोर विद्येत चूक झाल्यामुळे बाकीच्या दोघींचा सुधा मृत्यू झाला . आज आजोबांच्या कृपेमुळे आम्ही सगळे सुखरूप आहोत पण आज आमचे आजोबा या जगात नाहीत... Aniket




No comments:

Post a Comment