Thursday, January 21, 2016

नमस्कार मित्रहो , मी मनिष सुर्वे आज आपणासमोर एक खरीखुरी कथा सदर करीत आहे
हि घटना आहे साल १९९९ मधली म्हणजेच आजपासून १६ वर्षांपूर्वी घडलेली आहे , मुख्य म्हणजे आजची घटना हि कोकणातल्या नामांकित अश्या घाटापेकी एक कशेडी घाट शी निगडीत आहे.कशेडी घाट तर अपना सर्वाना माहितच आहे जो नेशनल हायवे १७ वर आहे .
अमित,नेहा आणि प्रकाश हे तीन भावंड मुंबईत त्यांच्या परिवार सोबत राहायला होते, तर असेच एकेदिवशी अचानक अमित ला गावावरून फोन आला कि त्याच्या चुलत भावाचे लग्न ठरले आहे आणि लवकरच अचानक साखरपुडा हि ठरला आहे तेव्हा तुम्ही सर्वांनी ताबडतोब वेळ मिळेल तसे निघून या असे अमित चे चुलत भाऊ प्रदीप ह्याने सांगितले आहे.अमित ला हि बातमी समजली तेव्हा तो खुश झालाच होता पण अचानक सुट्टी मिळणार तरी कशी हा प्रश्न होता,मग कशी बशी त्याने बॉस कडून रजा मंजूर करून घेतली आणि घरात हि सर्वाना कळवले. अमित चे आई बाबा म्हणालेत कि तुम्ही तिघे जन जमल्यास जाऊन या मग लग्नाला तर आम्ही येतच आहोत ,मग अमित ठीक आहे म्हणाला आणि नेहा व प्रकाश ला घेऊन निघाला.अमित ने नुकतीच त्याची कोरीकाराकरीत स्कोर्पियो घेतली होती. सर्व तयारी करून हे तिघेजण रात्री जेवण आटोपून ९.३० वाजता गावी राजापूर ला जाण्यासाठी रवाना झाले .आणि त्या वेळी आताच्या इतके ट्राफिक हि नव्हते असल्यामुळे रस्ता पूर्णपणे मोकळा होता ....एव्हाना मुंबई सोडून अमित ला एक तास भर झाला होता आणि मेन हायवे ला गाडी लागली होती ....कर्नाळ्याच्या त्या खिंडीतून घनदाट जंगलातून त्यांच्या रहस्यमय प्रवास चालू झाला होता....शहराचा गोंगाट सोडून मस्त पेकी गाडी आता कोकणच्या निसर्ग्कुशीत शिरली होती...मधूनच खिडकी उघडली कि थंडगार हवेचा झोत झुळकायचा....शुद्ध हवा मनाला आणि तनाला रोमांचित करणारी होती आणि इथे मात्र अमित पुरता ताशी १००-११० च्या वेगाने बेफाम गाडी पळवत होता .
साधारण मध्यरात्री १.३० कि २.०० च्या दरम्यान अमित ने त्याची स्कोर्पियो पोलादपूर जवळ एका ढाब्यावर थांबवली आणि चहा घेतला...कारण थंड हवेच्या गार गार स्पर्शाने त्याला झोप अनावर होत होती ....अमित ने चहा आटोपून पुन्हा एका गाडीत पेट्रोल भरले आणि टायर नीट चेक केलेत ..कारण कुणास ठाऊक ह्या पुढचा प्रवास जितका वळणदार आहे तितकाच घातक हि असेल..मग अमित ने गाडी सुरु केली आणि पुन्हा आपल्या प्रवासाला लागला ,५-६ किमी अंतर पुढे गेल्यानंतर कशेडी घाट सुरु कृपया वाहने सावकाश चालवा.असा बोर्ड दिसू लागला आणि चालू झाला तो नागमोडी वळणांचा वळणदार प्रवास .....प्रकाश आणि नेहा हि एव्हाना गाडी इकडे तिकडे डोलू लागल्यामुळे जागे झाले होते...नेहा ने गाडी ची काच खाली सरकवली होती....खिडकीतून बाहेर पहिले तर नुसता काळाकुट्ट अंधार दिसत होता....घनदाट झाडी गर्द अशी दिसत होती ...झाडांच्या फांद्या जणू काही अश्या पसरल्या होत्या कि खरोखरच एखादी हडकुळी म्हातारीच त्या प्रत्येक झाडावर बसली असावी...त्या पूर्ण घाटातून क्वचितच एखादा ट्रक किवा एसटी बस पास व्हायचीध्येच पाखरे आणि रातकिड्यांचा किलबिलाट कानावर पडायचा .....काही अंतर पुढे गेल्यावर अमित ची गाडी अचानक बंद पडली ,त्याने पुन्हा स्टार्ट केली तरी सुरु होईना ..अमित पुटपुटला नि म्हणाला कि हिला पण आताच इथे ह्या घाटात बंद पडायची होती ....नेहा आणि प्रकाश हि गाडीतून बाहेर पडले आणि अमित ला विचारू लागले कि काय प्रोब्लेम झालाय रे दादा.तर अमित म्हणाला कि काही नाही इंजिन गरम झाले असावे बहुतेक...प्रकाश म्हणाला कि आताच तर मगाशी ढाब्यावर आपण सर्व विश्रांती घेतली,इंजिन मध्ये पाणी टाकले ,पेट्रोल भरले मग अजून काय प्रोब्लेम असेल...तितक्यात समोरून एक म्हातारी हातात कंदील घेऊन येताना दिसली आणि जशी ती समोर आली तशी गाडीची हेडलाईट अचानक गेली ..तेवड्या इथे हे तिघे हि घाबरलेत...आता फक्त ती म्हातारी त्या कंदील च्या उजेडात दिसत होती ...तिचे केस पूर्णपणे मोकळे सोडलेले होते आणि कपाळावर भलामोठा कुंकवाचा टिळा लावला होता..तीला पाहून सर्वच घाबरले होते पण बोलणार कोण...शेवटी अमित ने हिम्मत करून विचारले कि आपण कोण आणि इतक्या रात्री इथे काय करत आहात? त्यावर म्हातारी म्हणाली कि मी इथे जोगतीण म्हणून सोडलेली आहे आणि मी इथे खालतीच जंगलात राहते ....पण तुम्ही मुल इतक्या रात्री इथे थांबून काय करत आहात ..तेव्हा अमित म्हणाला कि आमची गाडी बंद पडलीय ....मग म्हातारी म्हणाली कि तुम्ही इथे क्षणाचा हि विलंब न करता इथून निघा आणि थांबू नका ...ती आता येणार आहे तिची आता वेळ झालीय ...हा घाट नाही हा घात आहे ...ह्या घाटाने बर्याच जणांचे घात केलेत आहेत ....तेव्हा तुम्ही इथून निघा..आणि म्हातारी पलीकडच्या रस्त्याने जाऊ लागली ,तितक्यात प्रकाशचे लक्ष सहजच तिच्या त्या उलट्या वाकड्या तिकड्या पायांकडे गेले आणि प्रकाश च्या अंगातून विजेची तार जशी चमकावी तसे झाले आणि त्याने अमित ला खुणावले तसा अमित हि पाहतच राहिला आणि पुढे अंधारात ती म्हातारी नाहीशी झाली कि कोण देव जाणे....आणि दुसरी कमालीची गोष्ट अशी कि म्हातारी गेल्याबरोबर लगेचच अमित ची गाडी स्टार्ट झाली आणि ते पुन्हा प्रवासाला लागलेत ..खूप वेळ झाला प्रकाश आणि अमित गप्प नि अधून मधून एकमेक्नाकडे पाहायचेत ..मग न राहवून नेहा ने त्यांना प्रश्न विचारला कि काय झालेत तुम्ही दोघे गप्प का आहात?
तेव्हा प्रकाश म्हणाला कि नेहा ती मगाशी भेटलेली म्हातारी मनुष्य नसून भुताटकी होती....तीला वाटले हा मस्करी करतोय मग अमित ने हि सांगितले कि प्रकाश म्हणतोय ते खरेय....त्यावर प्रकाश म्हणाला कि जमेल तितक्या लवकर हा घाट उतार म्हणजे झाले...आणि पुढे रस्त्याला लागून एक स्मशान लागले ...तिथे एक चिथा जळत होती आणि चिथा जिथे जळत होती तिथे त्या लोखंडी रॉड वर एक पांढरीफट लांब केस वाली पिवळ्या साडी मध्ये एक हडळ त्यात पाय सोडून बसली होती आणि मोठमोठ्याने हसत होती ....आणि तिचा आवाज अर्धा पुरुषाचा आणि अर्धा बाईचा असा येत होता....हे पाहून अमित चा हात स्टेरिंग वरून थरथरू लागला होता ...आता ह्या तिघांना काहीच सुचत नव्हते .....क्षणभर प्रकाश ने स्वताला चिमटे काढून पहिले आणि आपण स्वप्न नाही पाहत आहोत हे जाणवले आणि त्याचा आयुष्यात सर्वप्रथम विश्वास बसला कि जगात खरोखर भूत आहेच...आणि वेळ काळ कशी खराब असते बघा ना...अचानक तीच बाई(हडळ) गाडीच्या समोर येउन ठाकली आणि अमित कार्काछ्कन ब्रेक मारलेत ...आणि हेडलाईट च्या प्रकाशात ती बाई समोर तिचे अक्राळविक्राळ रूप धारण करून उभी होती ....तिचा चेहरा पूर्णपणे केसांनी झाकलेला होता आणि तिचे डोळे पूर्णपणे पांढरे फट होते...ती हळू हळू गाडीजवळ येत होती आणि अमित हि हळूहळू गाडी रिवस मध्ये मागे नेत होता ...पण ती बाई सुद्धा हळू हळू पुढे येतच होती ....पण गाडीत जोवर पपई चा कोवळा बांधलाय लाल फड्क्यामध्ये तोवर काही होणार नाही ह्याची खात्री अमित ला होती ...पण ती बाई मात्र अक्राळविक्राळ हास्य करत होती. पुरुष आणि बाई ह्याच्या मिश्र आवाजात मोठमोठ्याने किंकाळी फोडायची...मी नाही जाऊ देणार ,मी नाही जाऊ देणार तुम्हाला...इथे नेहा गाडी मध्येच हे सर्व पाहून बेशुद्ध झाली होती ...प्रकाश ची छाती मात्र जोर जोरात धक धक धक धक करत होती आणि ते त्याला स्पष्ट जाणवत होते ....अंगातून पूर्णपणे जीव निघून गेलाय असे त्याला जाणवत होते ,इथे अमितची हि अवस्था काही वेगळी नव्हती ...प्रकाश इतका बिथरला होता कि त्याने गाडीच लघुशंका केली ....मग अमित ने गाडीच्या सर्व काचा लावून घेतल्या ...केबिन मध्ये देवासमोर अगरबत्ती लावली,गाऱ्हाणे घातले आणि गाडी स्टार्ट केली तशी ती हडळ अजूनच चेकाळली आणि अमित ने कशीबशी गाडी वाकडी तिकडी नेत तीला आरपार केली आणि तरी सुद्धा ती हडळ गाडीच्या काचेवर मोठमोठ्याने हात मारत होती ....अमितचे हाथ नुसते थरथरत होते ,,त्याला धड स्टेरिंग पण धरता येत नव्हते...गाडी पळवायला सुरवात केली आणि कसा बस एकदाचा कशेडी घाट संपला आणि दिवानखावटी गावाच्या पायथ्याशी आलेत ...आणि मग अमित ने जी गाडी बेफाम पळवायला सुरवात केली ती थेट भरणा नका,खेड इथे थांबला आणि रील्याक्स झाला आणि प्रकाश ला धीर दिला आणि शांत केली...इथे नेहा मात्र अजून हि बेशुद्ध होती मग अमित ने तिच्या तोंडावर पाण्याच्या हबका मारला आणि ती शुद्धीव आली .... भरणा नका पेट्रोल पंपावर काही लोकांना घडला प्रकार सांगितला तेव्हा लोकांनी हि त्यांना धीर दिला आणि सर्व हकीकत ऐकून त्यांना मग सांगितले कि हा कशेडी घाटामध्ये वरचेवर अपघात होताच असतात आणि त्यात हि ५-६ महिन्यांपूर्वी एक म्हातारी बाई आणि तिची सून घाटाच्या पायथ्यापाशी मुंबई ला जायला निघाले होतेत आणि त्या एसटीची वाट पाहत होत्या....वाट पाहता पाहता कधी अंधार पडला हि समजले हि नाही ...त्यात तिची सून हि नुकतीच ३ महिन्यंची गरोदर बाई होती ....तितक्यात अचानक २-३ ट्रक वाले काही मदराशी आलेत आणि म्हणालेत कि अम्मा जी कहा पे जाना है...मुंबई जाणा है तो मे छोड देत हु हम भी उधार हि जा रहे है ....म्हातारी ला ते योग्य नाही वाटले म्हणून ती नाही म्हणाली ...मग त्या मद्राशी लोकांना त्यांच्या अविश्वास पाहून अजूनच राग आला आणि तिच्या सुनेला ते जबरदस्ती ट्रक च्या केबिन मध्ये बसवू लागले आणि म्हातारी त्यांना प्रतिकार करू लागली पण त्यांच्या पुढे म्हातारीचा निभाव लागला नाही आणि तिच्या सुनेला त्यांनी गाडीत बसवले आणि निघून गेली...पण बिचारी म्हातारी मात्र त्या ट्रक च्या मागे धावू लागली आणि तिचा तोल जाऊन ती पलीकडे जाऊन पडली आणि समोरून येनाराच्या एका ट्रक च्या चाकाखाली तिचा मृत्यू झाला...ते ट्रक वाले पुढे काही अंतर जाउन थांबले आणि त्या गरोदर बाईवर अमानवी पार्श्वी बलात्कार केला आणि तीला मारून तिथेच सोडून दिले ..आणि त्याच दिवसही पासून त्या मेलेल्या गरोदर बाईचा आत्मा हडळ बनून त्या घाटामध्ये फिरत असतो...नेहमी नाही पण क्वचितच अमवस्या आणि पौर्णिमेला हि घटना घडते ....म्हणून साहेब तुम्हाला एक सांगतो कि जर तुम्ही कधी कोणता घाटामधून प्रवास करत असाल तेव्हा घाट सुरु होण्याआधी प्रत्येक घाटाच्या आधी पायथ्यापाशी एक मंदिर लागते...हो प्रत्येक घाटा मध्ये एक छोटेसे मंदिर असतेच...ज्या त्या जागेवाल्याचा मान असतो ....आणि मंदिरात पाया पडून दर्शन घेऊन आमचा प्रवास सुखाचा होवो अशी प्राथर्ना करावी ....विचाराने मती गुंग झाली होती पण तरीही अमित ने थोडा धीर सावरला आणि कसाबसा सकाळी ८ वाजता गावी राजापूर ला पोहोचला .
निष्कर्ष: तर मित्रानो हि होती आजची कथा आणि हो हि खरी खुरी घडलेली कथा आहे...कोकणातील मुंबई गोवा हायवेवरील कशेडी घाट हा आजही डेंजर मानला जातो कारण दिवसागणिक तिथे अपघात होत असतात आणि मेलेले तृप्त आत्मे वास करून असतात...असे म्हणतात कि अजून हि केव्हा तरी कशेडी घाटा मध्ये एक पूर्ण पांढरे वस्त्र घातलेला माणूस गाडीच्या समोर येउन गाडी अडवतो...माहिती करून घायायची असल्यास पोलादपूर किवा खेड कशेडी इथले गावचे कोण तुमचे ओळखीचे असेल त्यांना विचारून घ्यावे ....आपण म्हणतो तसे नसते पण घाटामध्ये हि असे अनेक भयानक अनुभव प्रत्येकाला येत असतात...पण वेळकाळ चांगली असेल तर तो देव हि आपल्या पाठीशी असतोच...
समाप्त.

No comments:

Post a Comment