Tuesday, March 29, 2016

नमस्कार मी वर्धान माने
रत्नागिरीतील राजापुर मधे घडलेली ही अंगावर काटा आणणारी ही घटना।
2007 सालची घटना असेल। त्यावेळी मी सातवीत शिकत होतो. शाळएत जाण्याचा मार्ग हा पर्या(पावसातील व्हाळ किंवा वाहणारे पाणी) वरून जातो..
दुसरा कोणताही रस्ता नसल्याने त्याच रस्त्यावरून आम्हास जावे लागे। संध्याकाळी पारावर गोष्टी करणारे म्हातारे म्हणत की त्या पर्यावर काहीतरी अमानवी शक्ति आहे। पण आमच वय खेळण्या बागड्न्याचे असल्याने आम्ही नेहमीच त्या गोष्टिकड़े दुर्लक्ष केला।
माझा एक जिवलग मित्र अमित आणि मी नेहमीच त्या वाटे वरून शालेत जात असू।
आम्हा दोघाना शिक्ण्यापेक्षा मस्ती करायलाच आवडे। म्हणून एक दिवस आमच्या घरी आजीचे श्राद्ध आहे अस खोट सांगुन आम्ही दोघेही घरी यायला निघालो।
म्हाळवसाचे ते दिवस।
दुपारच्या प्रहरात आम्ही दोघे चालत होतो। सभोवती दाट झाडी।
पोटात भुकेने डोम उसळलेला।
वाटेत काजूची बोंडे, करवंद खात मज्जा मस्ती करत चाललो होतो.
पर्याजवळ आलो। तेवढ्यात अमित म्हणाला की या पर्यामधे एक 'आटकं' नावाचं झाड आहे। त्याची आंबटगोड़ फळ मस्त लागतात.
माझ्याही तोंडाला पाणी सुटल।
पण पारावर ऐकलेल्या त्या अमानवी शक्तीचा विचार माझ्या मनात चमकून गेला।
पण 'आटकं' च्या आंबट गोड़ चविपुढ़े सर्व फ़िक वाटल।
('आटक' हे कोकणात मिळनारे एक फळ आहे। आंबटगोड चवीचं। तिखट मीठ लावून खायला मजा येते).
दोघेही त्या झाडावर चढलो। लाल रक्ताच्या रंगाची ती फळ बघून दोघेही सुखावलो।
दोघानिही फळ काढायला सुरुवात केली।
एक खिसा भरला तस मी खाली उतरलो.
पण अमित मात्र तसाच झाडावर बसून जास्त फळ काढण्याचे अपेक्षेने बसून राहिला। मी तिथल्याच एका दगडावर बसून फळ खावु लागलो।
तेवढ्यात झाडाच्या पाचोल्यातिल कुरबुर माझ्या कानावर पडली। मी दुर्लक्ष केला। पानाची सळसळ वाढली। तस मी मागे पाहिल आणि माजी बोबडी वळली।
हिरव्या रंगाची साडी केस विस्फार्लेली एक बाई नजर रोखून आमच्या दोघंकड़े पाहात होती। मला घाम फुटला। तोंडून शब्द फूटेना। माझा मित्र ते भयावह दृश्य पाहून झाडावरुन खाली कोसळला। दगडावर आपटला. 
त्याच्या डोक्यातून रक्ताचा पुर निघाला। ती भयावह बाई त्या रक्ताकड़े एक टक पाहू लागली। आणि क्षनार्धात ते रक्त चाटून पिउ लागली।।
माझ्या तर हातापायातील अवसानच संपले. रक्त पिवुन झाल्यावर तिने आपला मोर्चा माझ्या बेशुद्ध मित्राकडे वळवला।
हीच ती काहीतरी करण्याची वेळ होती। नाहीतर मी माझ्या मित्राला कायमचा गमवून बसलो असतो।
ती मित्राच्या जवळ पोचली। इतक्यात माझ्या गळ्यात असलेल्या जानव्याची( मुंज झाल्यावर सुतार ब्राम्हण आणि सोनार यांच्या गळ्यात एक धागा बांधतात त्याला यद्नोपवित असे सुद्धा म्हणतात) गाठ हाताशी धरली आणि आजोबानी शिकवल्या प्रमाणे गायत्री मंत्राचा जप सुरु केला। भीती ने उच्चार स्पष्ट होत नवते। तरीही दोनचार वेळा प्रयत्न केला। 
त्या बाइने मोर्चा माझ्याकडे वळवला तसा मी जोरजोरात मंत्रोच्चार चालु केला।
त्या बाईने आपले दोन्ही हात आपल्या डोळ्यावर घेतले। कदाचित माझ्या मंत्राचा असर असावा। आणि जोरात ओरडू लागली थांबव थाम्बव।
पण मी मात्र मंत्र चालु ठेवला। आणि माझ्या डोळ्यादेखत ती बाई नाहीशी झाली.
मित्राच्या जवळ गेलो। त्याच्या तोंडावर पाणी मारल। शुद्धित आला। तसा रडू लागला।
डोक्याला भली मोठी जखम झालेली। कसाबसा धरून वगेरे घरी आणला।
झालेला सर्व प्रकार अख्हया गावाला कळला। मित्राच्या जखमेवर गावतल्या ड़ोक्टारने मलमपट्टी केली।
अख्ख्या गावाने कौतूक केल की फक्त तुज्यामुलेच अमित च जिव वाचला आहे।
घरी येउन आजोबाना सांगीतल तर ते बोलले की मुंज झालेल्या मुलाच्या जानव्यामदे खुप ताकत असते। भुत किंवा अतृप्त शक्ति सहसा जवळ येत नाहित।
त्या पर्याजवळ 10 वर्षांपूर्वी एक बाई बुडून मेली होती। 3 महिन्याची गरोदर असताना मेलेली ती बाई अतृप्त इच्छा असल्याने हडळ झाली( गरोदर स्त्री मृत झाली की तिची पुढे हडळ होते).
तिच्या प्रेतावर अंतिम संस्कार न झाल्याने तिने हडळ बनुन सर्वना त्रास देण्यास सुरुवात केली।
पुढे गावकरयानी शालेत जाण्यासाठी एक नवा रस्ता केला। आजही सर्व मूल नविन रस्त्यावरून च शालेत जातात।
जुन्या रस्त्या वर कुंपण घातले आहे।
या प्रकारा बदल ची सत्यता पड़तालुन पाहण्याचा पुढे कुणी प्रयत्न केला नाही पण
आजही तो प्रसंग आठवून अंगाचा थरकाप उडतो।।

1 comment: