Tuesday, March 29, 2016

नमस्कार मी परेश बागुल, माझ्या आधी च्या कथे ला मिळालेल्या प्रतिसादा ला प्रेरित होउन पुन्हा एक चित्त थरारक कथा सादर करत आहे. कथा पुर्णपने काल्पनिक असुन याचा वास्तविकते सोबत कुठला ही संबंध नाही.
आपली आज ची कथा आहे समीर बद्दल. समीर हा अत्यंत प्रमाणिक व मेहनती प्रवृत्ति चा असल्यामुळे त्याला पुण्या (देहुरोड) मध्ये आयुध निर्माणी फॅक्टरीत (Ordnance Factory) स्टोर किपर चा जॅाब मिळाला होता. समीर च मूळ गाव बंाबरूड होत. बंाबरूड या गावात अज़ुन सुद्धा फारश्या सोय सुविधा नव्हत्या. अश्या वातावरणात वाढला असुन समीर ने आज एका नामांकित कंपनी मध्ये जाॅब मिळवला होता. यावरून च त्याच्या बुद्धी व कुशलते चा अंदाज लाऊ शकता.
समीर दर ६ महिन्यात त्याच्या आई-वडिलांना भेटायला येत असे. समीर चा आई वडिलां मध्ये खुप जीव होता, समीर चे शिक्षण पूर्ण करण्या साठी आई वडिलांनी खुप कष्ट केले होते आणि समीर ला पण या सगळ्या ची ज़ाणिव होती. समीर चे वडील गावात राहुन सुद्धा त्यांचे विचार महान होते, त्यंाच्या आग्रहा मुळे च समीर ने काळज़ा वर दगड़ ठेउन शहरात जाॅब करण्या चा निर्णय घेतला होता. आई वडिलंाची सतत आठवन येत असुन पण समीर मन मारून जाॅब करत होता. अश्या परस्थितीत समीर ला धीर मिळत होता तो साक्षी कडून. समीर जिथे रूम घेऊन राहत होता तिथेच त्याच्या शेजारी साक्षी आपल्या आई वडिलां सोबत राहत होती. साक्षी व समीर एक दुसर्या ला २ वर्षां पासुन ओळखत होते. साक्षी खुप साधी भोळी पण गोड मुलगी होती. मनातल्या मनात ती समीर वर प्रेम करायला लागली होती पण समीर ला अजुन याची कल्पना नव्हती. समीर एकठा असल्याने साक्षी त्याची खुप काळजी घेयची , कुठला पण नविन पदार्थ बनवल्या वर समीर ला न चूकता स्वताच्या हाताने खाऊ घातल्या शिवाय तीला चैन पडत नसे. एवढच नाही तर तीने तीच्या घरच्यांना पण समीर बद्दल सुचवले होते, साक्षी ला समीर आवडत असल्याची कल्पना साक्षी च्या आई वडिलांना होती. त्यांना पण समीर ला आपला ज़ावई करून घेन्यात काही आपत्ती नव्हती. समीर तसा होताच सूसंस्कारी. व दिसायला पण छान होता आणि तो नियमित पणे न चूकता महादेवा च्या देउळात जात असे. त्याच्या अश्या वागन्या मुळे समीर ने साक्षी च्या आई वडिलांच मन जिंकल होत.
आता वळूयात मूळ कथे कडे, समीर ने यावेळेस पण नेहमी प्रमाणे गावाला जायचे ठरवले, हि बातमी मिळताच साक्षी थोडी उदास झाली व मनाला धीर देत समीर ला भेटायला आली व स्वताची काळजी घे व इतर गोष्टींचे निर्देश देउ लागली. समीर ने सगळी तयारी करून साक्षी व तीच्या आई वडिलांचा निरोप घेतला, साक्षी पण स्वताचे अश्रु लपवत हाथ हालवून समीर ला बाय करू लागली व पोहचल्या वर काॅल कर असा निर्देश दिला. समीर ला ट्रेन ने १ दिवसाचा प्रवास करावा लागत असे आणि त्यात नेमक यावेळेस समीर ची ट्रेन चक्क ३ तास उशीरा पोहचली होती. १ दिवसा चा प्रवास करून समीर पाचोरा पोहचला. पाचोर्या वरून समीर च मूळ गाव २० कि.मी च्या अंतरावर होते. रात्री चे १ वाजले होते अश्या परस्थितीत गावा कडे जाणारी कुठली च बस व रिक्षा मिळणे शक्य नव्हते म्हणुन समीर ने चालत जाण्या चा निर्णय घेतला. समीर ला खात्री होती वाटेत कोणी बाइक सवार मिळेल च लिफ्ट घेण्यासाठी.थोडा अंतर चालल्या वर समीर ला एका बाइक चा आवाज़ आला व त्याने हाथ करून बाइक वाल्याला थांबवले व पुढे परंतर सोडण्या ची विनंती केली. समीर ला लिफ्ट मिळाल्या मुळे तो खुश होता पण समीर च दुर्दैव च म्हणावे कारण तो बाइक चालक अंतुर्ली गावाचा राहणारा होता जिथुन समीर चे गाव १० कि.मी होते. बाइक चालक ने समीर ला अर्ध्या रस्त्यात सोडले व पुढे सांभाळुन जाण्यास सांगितले. बाइक चालक पिलेला असल्याने समीर ने त्याची चेतावनी ला मनावर नाही घेतले आणि गावाकडे ज़ाण्यास निघाला. रस्त्यात एक पण रोड लाइट नसल्याने सगळीकडे गडद आंधार होता, समीर कस बस मोबाइल च्या टाॅर्च च्या उजेडात हेडफोन ने साँग्स ऐकत चालत होता. सगळी कडे भयान शांतता असल्याने फक्त समीर च्या पाउलांचा झप झप आवाज़ स्पष्ट पणे ऐकु येत होता. आजू़ बाज़ू घनदाट झाडान मधुन चित्र विचित्र आवाज़ येत होते पण समीर वर याचा काही परिणाम होत नव्हता, तो बस एका लय मध्ये चालत होता. त्यावेळेस गावामध्ये हडळ, पिशाच, चकवा, हाकामारी सारखे भूता खेतांचे प्रकार खुप प्रचलित होते ज्यांची समीर ला बिल्कुल कल्पना नव्हती. गावा मधल्या लोकांनी हे प्रकार अनुभवले होते म्हणुन रात्री त्या रस्त्या वरून येण्या ची हिम्मत कोणी करत नसे. समीर च्या नकळत पाउला पाउला वर त्याच्या माघे चित्र विचित्र आकृत्या, पिशाच व हडळी त्याचा घात करण्या साठी पाठलाग करत होत्या पण त्यांना यश मिळत नव्हते, त्याच्या माघे पण एक कारण होते. असे म्हणतात जोपरंतर एखाद्या व्यक्ति च्या मनात भय भावना येत नाही तोपरंतर कुठला च भूत किवा प्रेत त्या व्यक्ति चा घात करू शकत नाही. आपल्या मनातले भय या अमानविय नराधमांना शक्ती प्रदान करत असत.
पण समीर च्या चेहर्या वर भय चा कुठलाच भाव नव्हता, शहरात राहत असल्याने त्याला या गोष्टींचा काही अनुभव व कल्पना पण नव्हती. तसा समीर पण शारीरीक व मानसिक पणे दृढ होता. कानात हेडफोन असल्याने आपल्या अवती भोवती काय घडतय याचा त्याला बिल्कुल पण भान नव्हता. समीर ने आता निम्मी रस्ता पार केला होता कि तेवढ्यात मोबाइल ची बॅटरी ने पण साथ सोडला व मोबाइल आॅफ झाला.
त्याच्या वर घात करण्या साठी दृष्ट शक्ती आतुरते ने वाट पाहत होत्या. आता त्याला वातावरणातला गारवा ज़ाणवत होता व गडद आंधारा मुळे त्याचा अात्मविश्वास पण खचत चाल्हा होता, त्याला कळुन चूकले होते कि त्याचा पाठलाग केला जातोय. पण चालत राहण्या शिवाय काही पर्याय उरला नव्हता.
तेव्हा त्याच्या कडुन एक चूक घडली, त्याने माघे वळून बघितले. तेव्हा त्याला दिसल्या त्या विद्रूप आकृत्या....! आता तो खुप घाबरला होता व आपली ट्रॅवेल बॅग जागीच सोडुन धावत सुटला, धावतांना त्याला कळून चूकले कि आपण त्याच ठिकाणी पुन्हा पुन्हा येत आहे. त्या विचित्र गुरगुरण्या च्या आवाज़ा ने त्याचा थरकाप उडवला होता, तो थकुन एका झाडा खाली बसुन आपल्या मृत्यु ची वाट पाहु लागला, भिती ने त्यावर पूर्णपने ताबा मिळवला होता आणि आता त्याच्या वर घात करणे सोपे होते. तेव्हाच एका विचित्र आकृती ने त्याच्या वर घात केला आणि त्याच्या शरीरात प्रवेष केला. समीर आता शारीरीक व मानसिक रित्या त्या शक्ती च्या ताब्यात होता व त्या अमानविय शक्ति ने समीर द्वारे आपल्या इच्छा पूर्ण करण्याचा निश्चय केला. समीर आता बदलला होता, तो उठुन माघे गेला व आपली बॅग घेउन घरी जाण्यास निघाला, थोड्याच वेळात तो घरी पोहचला व त्याने दार ठोठावले. इतक्या रात्री कोण आले असेल असा विचार करत समीर च्या आई ऊठल्या व त्यांनी विचारले कोण आहे? पण समोरून काहीच उत्तर नाही आले. असे २-३ वेळा झाले. समीर च्या आईंना हा हाकामारी चा प्रकार वाटत होता.
त्यांनी दारा च्या फटीतून बघितले तर त्यंाना समीर दिसला, त्याचा आवतार विचित्र दिसत होता. विस्कटलेले केस, मळके कपडे व लाल शार डोळे आणि तो तोंडातल्या तोंडात काही तरी पुटपुटत सारखा मानेला हिसका देत होता. हे दृष्य पाहुन समीर च्या आई जोरात किंचाळल्या, त्यंाची किंचाळी ऐकुन समीर चे वडिल धावत च आले. समीर च्या आई भिती ने थरथरत होत्या, त्यांना शब्द उच्चारणे पण कठीन जात होते, त्यावर समीर च्या वडिलांनी विचारले काय झाले तेव्हा दारा कडे बोट दाखवत त्या थरथरत्या आवाज़ात स..स...समीर ऐवढच बोलु शकल्या. हे ऐकताच समीर च्या वडिलांनी धाडकन दार उघडले व बघितले की समीर वरांड्यात कोसळलाय. त्यंानी पटकन त्याला उचलुन घरात खाटे वर झोपवले व त्याला शुद्धी वर आणन्या चा प्रयत्न करू लागले पण काही केल्या तो शुद्धीवर येत नव्हता, तो झोपेत सुद्धा थरथरत होता म्हणुन समीर च्या वडिलांनी त्याला पांघरवल व सकाळ होयची वाट बघु लागले. सकाळ होता च समीर च्या घरी चंागलीच गर्दी जमली होती, समीर अजुन पण बेशुद्ध होता. तेवढ्यात समीर चे वडिल आपल्या सोबत वैद्य घेऊन आले. वैद्य ने समीर ला तपासले तर ते पण आश्चर्यचकित झाले कारण त्याची ह्रदय स्पंदने व श्वास घेणे नैसर्गीक रित्या कार्य करत होते व तो पुर्णपने ठीक होता. वैद्य समीर च्या वडिलांना आश्वासन देत म्हणाले कि तो फक्त बेशुद्ध झालाय आणि लवकरच शुद्धी वर येईल.
इकडे साक्षी त्याच्या काॅल चा वेट करत होती व तीला त्याची काळजी वाटत होती, तीने त्याला काॅल पण करून बघितले पण त्याचा मोबाइल आॅफ येत होता. तीने सकाळ पासुन काही खाल्ले पिले नव्हते. संध्याकाळ झाली तरी समीर शुद्धी वर आला नव्हता. समीर च्या आई रडुन रडुन बेहाल झाल्या होत्या. बघता बघता रात्र झाली, समीर चे आई वडिल त्याच्या शेजारी झोपले होते. समीर ने अचानक डोळे उघडले व आपल्या आवती भोवती बघु लागला. भाग - ३ (शेवटचा)
पण समीर आता पिशाच च्या वश मध्ये होता व त्याला लागली होती रक्ता ची तहान. त्याची चालण्या ची चाल बदलली होती, तो एका अशक्त वाघा सारखा घरात रेंगाळत चालला होता. रेंगाळत रेंगाळत तो घराच्या मागच्या गोठ्यात पोहचला होता. तेवढ्यात गोठ्यातल्या गायी म्हशींच्या किलबिलाट ने समीर चे वडिल जागे झाले, त्यांनी बघितले की समीर बिस्तार्यात नाहीये. ते ताबडतोब आवाज़ा च्या दिशे ने धावले. गोठ्यात पोहचताच त्यांची बोबडी वळली, समीर ने एका वासरू चा घात केला होता. समीर ने वासरू ची चीर फाड करून लचके तोडत होता, खुप भयानक दृश्य होत ते. समीर पूर्ण पने रक्ताने माखला होता. त्याने वळून वडिलांन कडे बघितले व विचित्र पणे हासत लचके तोडु लागला. समीर च्या वडिलांनी तिथुन पळ काढला व आपल्या पत्नि ला उठवले आणि बाहेर जाउन मदती साठी आरडा ओरड करू लागले. सगळ्या गल्लीतली लोक त्यांच्या घरा भोवती एकत्र झाली, सगळे विचारू लागले काय झाल ? काय झाल ? पण समीर चे वडिल बोलण्या च्या परस्थितीत नव्हते. ते सोबत ३-४ लोकांना गोळा करून गोठ्या परंतर घेउन गेले, तिथले दृश्य पाहुन सगळेच स्तब्ध झाले. त्यांनी समीर ला आवरायचा प्रयत्न केला पण तो कोणाला ज़वळ येउ देइना, वाघा सारखे पंजे मारून त्या लोकांना जवळ येउ देण्यास अडवत होता जणु एखादा वाघ चूकुन मानसांच्या वस्तीत शिरलाय. शेवटी असंख्य प्रयात्ना नंतर त्याला लोकांनी धरले व तिथेच गोठ्यात एका खांँब ला बांधुन ठेवले. आपल्या मुला ची अशी दुर्गती पाहुन समीर ची आई ढसा ढसा रडत होती. समीर च्या वडिलांना कळुन चूकल होत हा सगळा काय प्रकार आहे. सकाळ होताच समीर पुन्हा बेशुद्ध झाला. समीर च्या वडीलांनी गावाच्या वेशी जवळ एका खंडर मध्ये वास करणार्या भगत ला सोबत घेउन आले व समीर बरा झाल्यास त्याला १वर्षा परंतर दर आठवडा बोकड्या च मटण कबूल केले. भगत आपल्या विद्या मध्ये सिद्ध होते. भगत ने वेळ वाया न घालवता समीर च्या घरी यज्ञ मांडला व यज्ञा समोर समीर ला बसवुन मंत्रांचा जाप करू लागले. तसाच थोड्यावेळात समीर शुद्धी वर आला आणि विचित्र आवाजात किंचाळु लागला. भगत ने त्या पिशाच ला समीर चे शरीर सोडायचा आदेश दिला, पण समीर फक्त स्वताचे ओठ चावत दातमिठ्या खात हसत व किंचाळत होता. शेवटी भगत ने आपल्या झोल्या मधुन कसली तरी भभूती काढली व समीर च्या आंगावर टाकली तसा समीर तडफडला व घोगर्या आवाज़ात भगत ला चेतावनी दिली- "दिवसा माझी शक्ती कमी अाहे म्हणुन आता माझ्यावर जोर आज़मवतोयेस, रात्र होताच पहिले तुझ काळीज़ काढुन ज्या खंडर मध्ये तू तप करतोस तिथेच तुझी समाधी बनवुन टाकेल, अज़ुन पण वेळ आहे स्वताचा जीव वाचव अाणि निघुन जा इथुन. " एवढ बोलुन समीर पुन्हा बेशुद्ध झाला. हे ऐकताच भगत धावत सुटला व जाता जाता बोलला कि हे शक्तिशाली पिशाच आहे याला मी नाही बंधीस्त करू शकत मला माफ करा.
इथे दुसरीकडे साक्षी अजुन समीर चा काॅल नाही आला म्हणुन बावरी झाली होती, तीला कल्पना आली होती कि समीर नक्कीच कुठल्या तरी संकटात आहे म्हणुन तीने स्वता जाउन तपास लावायचे ठरवले. घरी ट्रीप चा बहाणा सांगुन साक्षी समीर च्या गावी रवाना झाली. इकडे समीर ची हालत दिवसें दिवस खराब होत चाल्ली होती, त्याला सतत रक्ता च्या उलट्या होत होत्या. १ दिवसाचा प्रवास करून साक्षी समीर च्या गावी पोहचते. गावकर्यां कडुन समीर बद्दल कळता बरोबर साक्षी बेभान धावतच समीर च्या घरी पोहचते. गर्दी मधुन वाट काधत ती पुढे येते व समीर ची झालेली अवस्था पाहुन जागीच स्तब्ध होते अणि बेशुद्ध होउन ज़मीनीवर कोसळते. तीला बघताच समीर चे आई वडील तीला ओळखुन घेतात.(समीर ने बर्याच वेळा आई वडिलान कडे तीचा उल्लेख केला होता) शुद्धी वर येताच ती पण ढसा ढसा रडु लागते, समीर ची अशी अवस्था तीच्याकडुन बघितले जात नव्हती, त्याला एका पिसाळलेल्या कुत्र्या सारखे बांधुन ठेवले होते. साक्षी त्याच्या जवळ जाणार इतक्यात समीर च्या आईं ने तीला आवरल व शांत करण्याचा प्रयत्न करू लागल्या. ती समीर कडे जायचा हट्ट करू लागली पण तीला महीत नव्हत कि तीचा समीर त्या दृष्ट शक्ती च्या ताब्यात आहे. शेवटी गावातल्या एका वृद्ध व्यकती ने समीर ला गावातल्या प्राचीन महादेवा च्या मंदिरात नेण्याचा परामर्श दिला. तीथे एक साधु बाबा राहतात जे कित्तेक वर्षांपासुन मंदीर चा रख रखाव करत होते. त्यावेळी सगळ्यांना तेच योग्य वाटले, समीर च्या वडिलांनी एक टोळी बनवली व समीर ला तीथे घेउन जाण्यास निघाले. साक्षी च्या हट्टा पाही त्यांनी तीला पण सोबत घेतले. रात्र खुप झाली होती, कंदीलच्या प्रकाशात सगळे मंदिरा च्या मार्गा वर चालत होते. वाटेत समीर स्वताला त्यांच्या तावडीतुन सोडवुन जंगलाच्या दिशे ने धावु लागला व थोड्याच वेळात नाहीसा झाला, सगळे जंगलाच्या दिशेने धावु लागले. साक्षी पण धावता धावता त्यांच्या पासुन वेगळी झाली, ती पण समीर ला हाका मारत त्या घनदाट जंगलात समीर ला शोधु लागली. तेवढ्यात अचानक समीर ने साक्षी वर हल्ला केला व तीला खाली पाडले तसा तो पण दुर वर जाउन पडला, कारण साक्षी च्या हातात होती रूद्राक्ष ची माळ जी समीर ने तीला दिली होती. समीर उठला व परत झाडांवर एखाडी माकडा सारखा सर सर चढुन एका झाडा पासुन दुसर्या झाडावर झडप घेउ लागला, समीर आता आक्रामक झाला होता. साक्षी पण त्याच्या माघे धावत होती. धावतांना ती बोलत होती समीर मला महितीये तू मला ऐकु शकतोस, त्या दृष्ट शक्ती ला तुझ्यावर ताबा नको मिळवु देउ. साक्षी चे हे शब्द समीर च्या कानी पडताच त्याचा वेग कमी झाला व तो झाडावरून खाली पडला व स्वताच्या आवाज़ात कन्हत बोलला- मी स्वताला या पिशाच च्या स्वाधीन केलय, माझ्यासाठी स्वताचा जीव धोक्यात नको घालवु, तू प्लीज़ जा माघारी, मी नाही वाचनार आता. तेवढ्यात साक्षी बोलली कि तू अशी हार नको मानु, तू त्या दृष्ट पिशाच सोबत लढ, ते तुझ शरीर आहे आणि त्यावर फक्त तुच ताबा मिळवु शकतो. साक्षी चे शब्द समीर ला बळ देत होते व तो आतल्या आत स्वताच्या शरीरा वर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करू लागला. समीर वेदने ने तळमळत होता, या संधी चा फायदा घेत साक्षी ने आपल्या हातातली माळ समीर च्या गळ्यात घातली. तसा समीर पण विज़ेचा झटका लागल्या प्रमाणे तडफडु लागला. साक्षी मदतीसाठी हाक मारू लागली व तेवढ्यात समीर चे वडिल आणि बाकीची टोळी तीथे पोहचल्या. क्षणा चा पण विलंब न करता समीर ला तसच बेशुद्ध अवस्थेत महादेवा च्या मंदिरात नेण्यात आले. समीर ची अवस्था बधताच मंदिरा च्या साधुंने यज्ञ ला सुरूवात केली आणि आपल्या जवळ असलेल्या एका जुनाट पुस्तकातुन देवाच्या मंत्रा चा जाप करु लागले व तसा समीर पण वेदने ने तडफडत होता. मंत्र उच्चारणा ला वयतागुन समीर शेवटी जोरात किंचाळला व पूर्ण बळाने त्याने ती माळ तोडुन टाकली. त्याला धरुन ठेवलेल्या लोकांना त्याने वरबडुन ज़खमी केले व त्या साधूंचे शीर धडापासुन वेगळे केले. आता शेवट ची आशे ची ज्योत पण व्हिज़ली. तेवढ्यात साक्षी ला एक युक्ती सुचली, तीने समीर च्या वडिलांना त्रिशुल घेउन मंदिरा च्या द्वार ची राखण करण्यास सांगितले आणि समीर ला कस पण करूण रोखुन ठेवायला सांगितले. समीर मंदीर च्या छता ला जाउन टेकला होता. साक्षी ने ते पुस्तक हाती घेउन योग्य त्या मंत्रांचा जाप सुरु केला, मंत्र समीर च्या कानी पडताच तो पुन्हा तडफडु लागला व त्याने साक्षीवर हल्ला केला. यावेळेस त्या निर्दयी ने साक्षी चे पोट फाडुन तीचा कोथळा बाहेर काढला. साक्षी रक्ताने माखली व जंमीनीवर कोसळली. हे पाहताच समीर च्या वडिलांनी काळज़ावर दगड ठेउन समीर च्या मांडीवर त्रिशुल ने वार केला व त्याला तीथे च रोखुन ठेवले. साक्षीने कसबस स्वताला सावरले व पुन्हा मंत्रजाप सुरू केला. यावेळेस ती यशस्वी ठरली अाणि तो दृष्ट पिशाच समीर च्या शरीरातुन बाहेर पडला व महादेवा च्या मूर्ती समोर येता क्षणी भस्म झाला. समीर लगेच भाणावर आला व त्याने बघितले साक्षी मरणाच्या दारात उभी आहे, त्याने तसच तीला मिठीत घेतले व ढसा ढसा रडु लागला. त्याला रडताना पाहुन साक्षी बोलली- समीर रडु नको आता तर तू खुश असायला हव. त्या पिशाचा च्या तावडीतुन तुझी सुटका झालीये. माझी नेहमी एकच इच्छा होती ती म्हणजे तुझ्यासोबत लग्न करण्याची, जी पुर्ण नाही होउ शकली याचीच खंत वाटते, मला माफ कर जे मी माझ प्रेम व भावना तुझ्यासमोर उशीरा जाहीर केल्या. तेवढ्यात समीर ने जवळ असलेला शेंदुर तीच्या कपाळात भरला. साक्षीच्या डोळ्यातुन आनंदाश्रू वाहु लागले व स्मितहास्य करीत तीने प्राण त्यागले. समीर तीला मिठीत घेउन वेड्या सारखा रडु लागला. तो ताडकन उठला व समोर पडलेल्या त्रिशुल स्वताच्या पोटात घालनार एवढ्यात त्याच्या वडिलांनी त्याला आवरले, समीर एक च हट्ट करत होता कि मला माझ्या साक्षी जवळ जायचय.
समीर च्या वडीलंानी त्याला शांत केले व त्याला समज़वु लागले- त्या पोरी ने तुझ्यासाठी स्वताच्या जीवाचा बलिदान केलाय, तीची इच्छा होती तू ज़गाव, तीचा बलिदान व्यर्थ नको जाउ देउ पोरा. एवढ ऐकताच समीर शांत झाला व तीला मिठीत घेउन रडु लागला. साक्षी ने समीर साठी स्वताचा प्राण गमवला होता, शेवटी याला च तर प्रेम म्हणतात.
समाप्त !

No comments:

Post a Comment