Tuesday, March 29, 2016

अरे रिक्षा जरा हळू चालव. पाऊस किती पडतोय? पावसात जर रस्त्यावर
ऑइल सांडलेले असेल तर गाडी लगेच स्लीप होते रे बाबा. . . . . ”
मी रिक्षावाल्या प्रदीपला
म्हणालो. तातडीने पुण्याला जायचे होते म्हणून मी गावाहून रिक्षाने रत्नागिरीला निघालो होतो. तिथून मग रात्री पुण्याची बस पकडणार होतो. रिक्षा रत्नागिरी सीटीत प्रवेश करत
होती तेवढ्यात रस्त्याच्या कडेला समीरची मोटरसायकल उभी दिसली म्हणून मी रिक्षा
थांबवली आणि खाली उतरलो. समीर समोरच्या दुकानातच सिगारेट घेत होता, मी हाक
मारली तसा वळून माझ्याकडे बघून हसू लागला. “अरे भल्या माणसा आहेस कुठे? किती वर्षांनी
भेटलास? ” मी म्हणालो.
मग मी रिक्षातून बॅग काढून घेतली आणि प्रदीपला रिक्षाचे भाडे देवून समीर
बरोबर निघालो. बसला अजून 2/3 तास वेळ होता. इतक्या वर्षांनी भेट झाली तर चला
सेलिब्रेट करू म्हणून मग आम्ही बारमधये बसलो आणि बियरच्या संगतीने जुन्या आठवणींना उजाळा देण्याचे काम सुर झाले. . . .
समीरची आणि माझी पहिली भेट अठरा वर्षांपूर्वी झाली. मी कॉलेज पूर्ण करून
नुकताच रत्नागरीतील एका कंपनीत जॉइन झालो होतो. आमची तिघा जणांची टीम होती. मी,
समीर आणि अल्ताफ ! समीर आणि अल्ताफ मला सीनियर होते. . पण आमची दोस्ती मात्र एकदम पक्की झाली होती. मी नवखा असल्याने मला फारसे काही कळत नव्हते. मग अल्ताफ आणि समीरने मला सांभाळून घेत सर्वकाही शिकवले. आमची कंपनी भगवती बंदरला होती
आणि मी गावाहून रत्नागिरीला अप डाउन करत असे, मग एस टी स्टॅन्ड पासून भगवती बंदर
पर्यंत सकाळी आणि संध्याकाळी परत असे आम्ही तीघे एकाच बाईकवरून जायचो !
पुढच्याच महिन्यात आम्हाला तिघांना कंपनीतर्फे तीन महिन्यासाठी विजयदुर्ग बंदरावर कामाला पाठवण्यात आले. तिथे पावसाळ्यात दोन मोठी जहाजे रीपेयरसाठी आली
होती. मग काय? आमच्या तिघांचीही राहायची सोय विजयदुर्ग किल्ल्यावर एका धर्मशाळेत
करण्यात आली. जेवण तिथेच एका हॉटेलमध्ये ! या तीन महिन्यात आम्ही खूप धूम धमाल केली सकाळी आठ ते संध्याकाळी आठ पर्यंत बोटीवर काम चालायचे! मग घरी येवून आंघोळ वगैरे करून जेवायला निघणार इतक्यात तिघांपैकी एकाला हुक्की यायची. मग
बाइक काढून देवगडला 40 कीमी जायचे आणि खंबा आणायचा. आमच्याबरोबर चंदू गाडगीळ
म्हणून बोटीवरचा एक कर्मचारीदेखील असायचा ! मग जेजेवण पार्सल घेरून रानात रात्री 2/3
वाजेपर्यंत पार्टी चालायची. . . सकाळी पुन्हा कामावर हजर! खरोखर ते दिवस अविस्मरणीय होते यात शंका नाही
ते तीन महिने संपल्यावर आम्ही परत रत्नागिरीला आलो आणि आणखी सहा महिने आम्ही एकत्र होतो. नंतर मग मी आणि अल्ताफने तो जॉब सोडला. अल्ताफ दुबईला गेला तर
मी दाभोळकर पॉवर कंपनीत जॉइन झालो. पण समीर मात्र तिथेच होता. आणखी 3 वर्षे. तीन
वर्षांनी त्यानेदेखील जॉब बदलला आणि रत्नागिरीतच दुसर्‍या कंपनीत जॉइन झाला. या
दरम्यान समीरने कंपनीतीलच एका मुलीशी लग्न केले आणि त्यांना तीन गोंडस मुले देखील झाली.
मी मग नोकरीनिमित्त गल्फला गेलो. अल्ताफचा दुबईलाच दुर्दैवी मृत्यू झाला
आणि. . . . . . . . . . . . .
मी एकदम चपापलो. चार वर्षांपुर्वीच समीर मॅसिव हार्ट अ‍टॅकने गेला. असे
कसे? काहीतरी गडबड आहे. आपण आता समीर बरोबरच तर बसलो आहोत बियर पीत ! मग.
. . . मग. . . . . तो चार वर्षापूर्वीचा गेलेला? असे कसे काय? बियरची सगळी धुंदी उतरली आणि
मी निरखून समीरकडे पाहू लागलो. काहीतरी गडबड आहे. . . काळजीपूर्वक विचार केल्यावर मला समजले की समीरचे शरीर पारदर्शक दिसतेय. एक वेगळीच चमक त्याच्या डोळ्यात होती. . . . .
तरीही मी धीर करून समीरला बोललो. . .
मी- अरे समीर पण तू तर. ? चार वर्षांपुर्वी तू गेलास रे. हार्ट अटॅक ने. मग आता
इथे कसा काय?
समीर - तुला काय वेड लागलंय का? काहीतरी बडबड करतोय? बियर जास्त
झाली काय तुला? मी- नाही रे समीर, आईशप्पथ. तुझ्याबरोबर काम करणार्‍या पाटीलने मला
सांगितले यार. .
1 डिसेंबर 2011. . . त्या दिवशी संध्याकाळी साडेचार वाजता तू काम संपवून
कंपनीतून निघालास, गाडीवर बसून किक मारलीस तेव्हाच छातीत कळ आली आणि तू तिथेच
जागेवर कोसळलास. समीर हसत होता. माझं बोलून झाल्यावर समीरने आणखी २ बियर
मागवल्या. काय भंकस लावलीस तू पण , बियर पी. एक मला दिली आणि एक त्याने स्वतःच्या
ग्लास मध्ये ओतली.
त्या दिवशी बार मध्ये दारू पिता पिता कधी वेळ निघून गेली समजलच नाही. अचानक माझ्या लक्षात आलं आपल्या बसची वेळ निघून गेली. मी समीरला बोललो सम्या अरे
माझी गाडी निघून गेली. समीर बोलला जाऊ दे रे, कशाला काळजी करतोस. आज वस्तीलाच
थांब माझ्या घरी, खूप वर्षांनी आपली भेट झाली आहे. मी पण विचार केला ठीक आहे पहाटेची
बस पकडली तरी मी पुणयात वेळेत पोहोचेल. संध्याकाळी साधारण ९ वाजता आम्ही दोघेही बार मधून घरी निघालो. पण मला समीरचं शरीर स्पष्ट दिसत नव्हतं. आपण नशेत आहोत म्हणून अस होत असणार, मनाला समजावत मी
त्याच्या पाठोपाठ निघालो. समीरने झाडाखाली उभी असलेली आपली बाईक काढली, मला
बोलला बस मागे आणि गाडी बाहेर रस्त्यावर काढली.
गाडीवर बसल्यावर थोड्या वेळाने मी माझा हात त्याच्या खांद्यावर टाकला, पण
माझा हात थेट सीट वर पडला. बियर खूप झाल्यामुळे होतय डोळे झाकायला लागले होते म्हणून जो काही प्रकार घडत होता तो माझ्या लक्षात येत नव्हता मी पुन्हा त्याच्या खांद्यावर हात टाकला पुन्हा माझा हात खाली सीट वर पडला. मी त्याच्या डोक्यावरच्या केसांना हात लावला पण हाताला काहीच लागत नव्हतं. आता माझी नशा उतरली. मी त्याला बोललो समीर गाडी थांबव मला लघवीला झाली आहे. त्याने गाडी थांबवली नाही उलट हायवेवर भरधाव वेगाने गाडी पळवत होता. बोलला अरे आपल्याला घरी जायला उशीर होतोय पुढे थांबवतो. मी बोललो अरे थांबव इथेच पुढे नको. तो ऐकायला तयार नव्हता. मी खूप घाबरलो. चालत्या
गाडीवरून उडी मारायचा मनात बेत ठरवला. तेवढ्यात त्याच्या छातीत कळ आली, तो जोरात
ओरडला, मी बोललो काय झालं समीर. त्याचा एक हात त्याने छातीवर ठेवला मोटरसायकल
डगमग करायला लागली, गाडीचा तोल गेला आणि आम्ही दोघेही रसत्यावर पडलो, मागून भरधाव वेगाने एक डंपर येत होता. गाडी माझ्या पायावरून गेली आणि समीरच्या अंगावरून. डंपर वाला थांबला नाही तो निघून गेला. माझा पाय मोडला आहे हे माझ्या आधी लक्षातच आलं नाही. समोर समीरच्या शरीराच्या चिंध्या चिंध्या झाल्या होत्या. ते बघून माझं शरीर थरथर कापायला लागलं. बाजूने गाडय़ा जात होत्या पण कोणीच थांबत नव्हतं. हळूहळू माझ्या पायातून वेदना यायला सुरवात झाली. मी कसा बसा घसपटत आपला जीव वाचवण्यासाठी रस्त्याच्या बाजूला गेलो. आता रस्ता निवांत झाला होता एकही गाडी नव्हती चांदणे पडले होते. मी जमीनीवर उताना पडलो होतो. माझ्या लक्षात आलं कोणीतरी मला उचलतंय. मी डोळे उघडले आणि बघितलं समीर चं ते फाटलेलं शरीर रक्ताच्या धारा वाहणारं ते विद्रूप शरीर माझा हात पकडून मला उचलत होतं. समीर मोठ्या मोठ्याने हसत होता. बोलत होता चल चल माझ्या सोबत. आणि मी बेशुद्ध पडलो. नंतर काय झालं मला काहीच माहिती नव्हतं.
डोळे उघेले, खिडकीतून येणारा उजेड दिसला. आजूबाजूला बघितलं मी हाॅस्पीटल मध्ये होतो.
बायको आणि आई माझ्या बाजूला बसल्या होत्या. ३-४ नातेवाईक पण होते. गावातली २ माणसं होती. माझ्या पायाला प्लास्टर लावलं होतं.
आई रडत रडत बोलली, बाबू हाॅस्पीटल मध्ये आहेस. चांदोरकर हाॅस्पीटल - रत्नागिरी
माझ्या जीवात जीव आला. आपण मरणाच्या दारातून परत आलोय या विचारानेच निश्वासाचा श्वास सोडला आणि निश्चिंत झालो. दुपारी बायको एकटीच माझ्या बाजूला बसली होती. मी तिच्याकडे विषय काढला. झाली घटना तिला सांगितली. गावातल्या २-३ जणांना पण सांगितली नंतर गावातल्या माणसांकडून समजलं की माझा अपघात त्याच ठिकाणी झाला होता ज्या ठिकाणी समीर मोरे ५-६ वर्षापुर्वी मोटरसायकल वरून पडून मेला होता. हे ऐकून मी थक्क झालो.
१५ दिवसांनी हाॅस्पीटल मधून डिस्चार्ज मिळाला, आणि मी महिना भराने
एकदा त्याच मार्गाने चाललो होतो, ज्या ठिकाणी माझा अपघात झाला होता,
समीर
पहिलयांदा मला जो भेटला तो त्याच ठिकाणी जेव्हा मी रिक्षा पकडून रत्नागिरीला चाललो होतो.
समीर २०११ याच वर्षी मेला होता, मला भेटलेला समीर हा समीर
नसून त्याचं भूत होतं. झाला प्रकार आजही आठवला की अंगावर शहारे येतात.

No comments:

Post a Comment