Tuesday, March 29, 2016

नमस्कार मित्रानो मी विवेक भुसारी हि घटना अंदाजे २० २१ वर्षापूर्वीची आहे.. तेव्हा मी माझ्या मामाच्या गावी होतो.. पहिली दुसरीला होतो मी तेव्हा.. माझे मामा शेतकरी होते त्यामुळे आमच्या कड घरी गाई-म्हशी होत्या. त्यामुळ संध्याकाळी दुध घ्यायला लोक घरी यायचे... आमच्या घराशेजारीच एक बाई राहायच्या त्यांना एक मुलगा आणि सून होती.. त्या आमच्या इथ दुध न्यायला यायच्या...आणि माझ्या आजो समवेत त्या गप्पा मारायच्या... एके दिवशी त्या आजी कुठ तरी नाहीश्या झाल्या... त्यांच्या मुलाने आणि सुनेने खूप शोधळ पण काही सापडल्या नाही... पण दुसऱ्या दिवशी गावातील लोकांनी त्यांना मदत करावी या विचाराने त्यांच्या घरचा रस्ता धरला आणि ते त्याच्या घरी गेले आणि त्यांना समजल कि त्यांची आई तर रात्रीच भेटली पण मृत अवस्थेत.. झाल अस होत कि ... त्या आजीनं रात्री शौचास जायचं होत.. पण त्यांची तबियत ठीक नव्ह्ती... म्हणून त्यांच्या सुनेने त्यांना घराच्या मागेच जा अस बजावलं होत.. पण त्यांना ते ठीक वाटल नाही म्हणून त्या जरा दूर गेल्या.. आणि खूप शोधलं तेव्हा त्यांचा मृतदेह च फक्त सापडला... आणि तो हि विहिरीत...
अस होत कि त्या आजीना त्यांच्या घरामध्ये कित्येकदा तरी त्यांच्या मुलाचे वडील वावरताना दिसले होते..
त्या मूळ ज्या रात्री त्या बाहेर पडल्या तेव्हा त्यांचा नवरा त्यांना दिसला आत्म्याच्या स्वरूपात..त्या चकव्याच्या जाळ्यात अडकल्या.. आणि त्यांनी आपला जीव आपल्या नवर्याच्या सांगण्यावरून दिला..
कथा २ ::
मित्रानो मी सुरेश गुंजाळ हा माझ्या बहिणीचा एक भयानक अनुभव इथे शेअर केला आहे..तुमचा भूतप्रेतावर कितपत विश्वास आहे मला माहित नाही पण हे खर ते माझ्या समोर घडल ते मी इथ सादर करतोय तर झाल अस होत कि माझी बहिण तेव्हा १२ वी मध्ये होती. तीच कॉलेज आणि माझ कॉलेज जवळ जवळच होत मी इनिजीनीरिंग ला होतो तेव्हा.. तर झाल अस होत. कि माझी बहिण तेव्हा घरून येताना टिफिन घेऊन यायची आणि तिच्या मैत्रिणी सोबत जेवायची.. तिच्या कॉलेजच्या मागे..एक जून मंदिर होत.. पण देव नव्हता त्यात.. विचित्रच मंदिर होते ते.. आतमध्ये.. काळा दगड होता तिथ. त्यावर फक्त राख लावलेली असायची नेहमी ना कुंकू ना कसला दिवा न कसली हळद.. तर माझ्या बहिणीने एक दिवस चुकून माझ्या मैत्रिणी सोबत तिथ जेवण्याच नियोजन केल.. आणि ती तिथ गेली देखील.. मी इकड माझ्या कॉलेजमध्ये होतो.. हे तिला आणि तिच्या काही फ्रेंड्सना माहित होत...तर झाल अस कि माझी बहिण तिच्या मैत्रिणी सोबत तिथ जेवायला गेली..
आणि थोड्याच वेळात.. मला आमच्या कॉलेजच्या गेटवरती गर्दी जमा झालेली दिसली.. आणि काही तरी चालल होत समोरच्या कॉलेजमध्ये..मी हि पाहिलं.. तर माझी बहिण होती... मला धक्काच बसला.. कारण ती पूर्ण कॉलेजच्या फेऱ्या मारत होती... ते हि न कशाला अडखळता आणि ती पूर्णपणे उलटी धावत होती.. तिच्या मैत्रिणी रडत ओरडत तिच्या मागे धावत होत्या.. माझ्या बहिणीचा अवतार विचित्र झाला होता.. केस मोकळे सुटलेले.. तोंडावर खरकट जेवण लागलेलं.. मी धावत गेलो तिथल्या आजूबाजूंच्या लोकांवर ओरडण्या ऐवोजी मला माझ्या बहिणीकडे जान महत्वाच वाटल आणि मी तिच्याकडे गेलो.. माझा मित्र अनुज पण माझ्या सोबत आला ..
मी माझ्या बहिणीला थांबवायचा प्रयत्न करू लागलो.. पण ती खूप वेगाने उलट्या पावलाने धावत होती... पूर्ण कॉलेज पाहत होत. माझा जीव रडकुंडीला आला होता ... काय होत होत ? माझ्या बहिणीला मला समजत नव्हत.. तरीही मी तिला गाठलं आणि पकडल.. तर ती वेगळ्याच आवाजात मला शिव्या देऊ लागली... एकवेळ मुलाच्या आणि एकवेळ मुलीच्या आवाजात ती ओरडत होती... मी तिच्यावर जोरात ओरडलो “अश्विनी काय झाल तुला ?? ” त्यावर तिने माझ्या हाताला चावल.. पण मी सोडल नाही मग अनुजने हि तिला धरून ठेवल... व तिच्या काही madam आल्या... माझ्या बहिणीच ते तडफडन चालू होत कि मी घरी कॉल करून माझ्या वडिलांना बोलवून घेतल...तेव्हा आम्ही तिला त्याच अवस्थेत घरी आणल.. आम्हाला कळेना झाल होत कि तिला काय झाल आहे ?? आमची आई थोडीशि जुन्या वृतीची होती.. बाबाना वाटल कि तिला झटका किवा फिट्स आले आहेत... पण तस नव्हत आमच्या आईने... तिला एकवेळ झापड लगावली.. मला माझ्या बहिणीची अशी अवस्था पाहून खूप रडायला येत होत.. तेव्हा आमच्या आईच्या एका ओळखीच्या मावशीनी सांगितल कि तिला बुलढाण्याला न्या तिथ कोणीतरी बाबा आहेत त्यांना दाखवा .. आम्ही त्याचं ऐकल मी आई आणि माझ्या बहिणीला आम्ही तिकडे नेले..(माफी असावी ते स्थान गुपित ठेवण्यात आल आहे ) माझी बहिण जागीच होत नव्हती..ती शुद्धीवर यायला तयार नव्हती..
तेव्हा आम्ही एक दिवस त्या बाबांच्या आश्रमात राहिलो माझे वडील आईवर रागवले होते तिच्या या अडाणीपणा मूळ.. म्हणून ते आले नव्हते.. आम्ही तिघेच आलो होतो... आम्ही त्या बाबांच्या आश्रमात राहिलो पण तिथ तर रात्री वेगळच घडणार होत.. तिथ माझ्या बहिणीसारखे बरेच जन होते.. ज्यांना बाहेरच वार लागल होत भूतबाधा झाली होती... तर रात्री त्यांच एक अनुष्ठान होत.. आम्ही रात्री आमच्या बहिणीला त्यांनी सांगितलेल्या मैदानी नेल. ते आश्रमातच होत.. तर त्यांचे काही एक दोन गुरुमाणसे होती.. जे त्यांच्या हातात काही झाडफुकेच सामान घेऊन होते.. त्यांनी माझ्या बहिणीला.. आणि काही इतर लोकांना एका रिंगणात उभ केल... आणि त्यांच्या गोलाकार बाजूने आग लावली... आणि त्यांनी त्यांच अनुष्ठान चालू केल.. व त्या समवेत... त्या रिंगणातील प्रत्येक जन माझ्या बहिणी समवेत जोरजोराने तडफडत ओरडत होता.. प्रत्येकाच्या शरीरामधून धुराचे लोट बाहेर पडत होते.. अस वाटत होत कि ते लोक आतमधून जळत आहेत.. आणि काही वेळाने त्याचं अनुष्ठान थांबल.. तेव्हा.. त्या गुरुमाणसांनी आमची भेट घेऊन आम्हाला माझी बहिण परत केली.. आणि त्यांनी सांगितल..कि माझ्या बहिणीमध्ये एकवेळीच दोन आत्म्यांचा वास होता.. आणि त्यांनी तो कसा आणि कुठून आला हे देखील सांगितल.. कि ते तिच्यामध्ये त्या मंदिराजवळून आले ते विचित्र मन्दिर कॉलेजने पाडून टाकल परत तिथ कुणी गेल नाही...कुणालाच माहित नव्हत ते कोणत मंदिर आहे ते त्या गुरुमाणसांना शक्यतो ते माहित होत पण त्यांना ते सांगण म्हत्वाच वाटल नाही...मला माझी बहिण सुखरूप परत भेटली... एवढच मी सांगेन.. धन्यवाद !! /**/

1 comment:

  1. मला इथल्या गोष्टी खोट्या वाटतात. कारण जे महत्वाचे प्रश्न असतात नेमक्या त्याच प्रश्नांची उत्तरे गाळून या गोष्टी लिहिल्या जातात. जसं की मंदिर कोणाचे होते? ते पाडताना त्या लोकांना कसा त्रास झाला नाही. बाबांचे नाव, आश्रमाचे नाव , पात्रांची आणि स्थळांची नावे. जर सत्यकथा असतील तर या सगळ्या गोष्टी कथेत यायला हव्यात. कोणाचं मन दुखावलं जाईल किंवा कोणाला त्रास होईल म्हणून नाव , गाव सांगता येत नाही हा निव्वळ बहाणा आहे

    ReplyDelete