Thursday, May 28, 2015

नमस्कार मित्रा माझ नाव निखिल भोँ ग ळे आहे..या पेजवर मी खूप जणांचे अनुभव वाचले...मला स्वताला असा कोणताच भुताचा अनुभव नाही..
काही दिवसपूर्वी मी आजोळी गेलो होतो...तिथे एक दिवस आजोबा कसलं तरी ताट घेऊन निघाले..मी पण त्यांचा सोबत गेलो....आजोबा चालत चालत गावाबाहेर आले आणि झाडाखाली ते ताट रिकाम केल...मी खूप विचारायचा प्रयत्न केला पण आजोबांनी काही बोलू दिल नाही.....परत येत असताना त्यांनी पूर्ण गोष्ट सांगितली....जी त्याच गावातील घडलेली होती...जाणीवपूर्वक गावच नाव सांगणे टाळत आहे..
साधारण 70 वर्षापूर्वीची ही कथा त्यावेळी माझे आजोबा लहान होते..छोटसं पण खूप सुखी गाव होत...पाण्याची काही कमतरता नव्हती...म्हणून शेतीचे उत्पन्न ही चांगलं येत होत...गावात एक मोठ मारुति मंदिर होत..लोक त्याची मनोभावेने पुजा करत...अगदी गुण्या गोविंदाने सागले राहत होते...त्यात माझा पंजोबाच घर तर गावातील मोठे सुखवस्तू घर होते....जरी गावात कोणाचं भांडण झाल.तर गावातील वयस्कर पंच लोक न्यायनिवडा करत...जुन्या काळात अशीच पद्धत सगळीकडे चालायची.......
त्या दिवशी आमचा घरातील सर्वजण जवळचा पाहुण्याचा लग्नासाठी गावाबाहेर गेले होते....पण कोणाला माहीत होत त्या दिवशी गावात भलतच काही घडणार आहे ते...... भर दुपारी एक विचित्र माणसाने गावात प्रवेश केला...अंगभर काळे कपडे..लांब पण विस्कटलेले केस...वाढलेली दाढी...चेहर्यावर मळ साचून काळा पडलेला चेहरा....आणि भयंकर डोळे...कोणीही त्याला पाहूनच घाबरेल...असा त्याचा अवतार होता...तो गावात आला आणि दारोदार फिरून भिक्षा मागू लागला....गावातील जुनी साधी सरळ लोक...दारात आलेल्या कोणालाही रिकाम्या हाती पाठवायच नाही...हेच त्यांचे संस्कार..प्रतेकाने त्याला भाकरी दिली...प्रतेक घरातून भाकरी घेऊन तो गावाबाहेर आला...
त्याने त्याचा झोळी मधून एक कवटी काढली...आणि सर्व भाकरीचा एक छोटा छोटा तुकडा काढून त्या कवटी मधे भरू लागला...सर्व भरून झाल्या नंतर त्याने...समोर कवटी ठेवून जोरजोरात मंत्रोच्चार चालू केल...आणि त्यात त्याने कुंकू...कापलेलालिंबू टाकले...आणि पुजा करु लागला... पुजा पूर्ण करून त्याने एका काळ्या कपड्यात ति कवटी बांधली आणि गावाला प्रदाक्षिणा घालू लागला...पण....काही अंतर गेल्या नंतर त्याचे पाय उचलेनात...त्याचा या नीच कृत्यात कोणीतरी विघ्न आणत होत....त्याने आजूबाजूला पहिलं तर तिथून जवळच मारुति मंदिर होत...म्हणूनच त्याला प्रदाक्षिणा घालता येत नव्हती....मग त्याने एका लहान मुलाला जवळ बोलावलं आणि त्याला गुळाचा छोटा तुकडा दिला आणि सांगितलं माझ एवढं काम कार...हे साहित्य घेऊन गावातून प्रदक्षिणा घाल....मी तुला अजून गूळ देईन.......लहानच मूल ते...लगेच मोहात पडल...आणि प्रदक्षिणा घातली........तो व्यक्ति त्या गावातून क्रूरपणे हसत निघून गेला......
दुसर्या दिवशी गावात विचित्र प्रकार घडला....सकाळी जेंव्हा लोकांनी घरचा दरवाजा उघडल समोरच दृश्य पाहून हदरलेच......कारण समोर हाड आणि कवट्याची रास होती......कोणीत री चेष्टटा केली असेल म्हणून सर्वांनी त्यावर दुर्लक्ष केल...पण दुसर्या दिवशी तर आणखी भयानक प्रकार घडला...अर्धवट जळालेल प्रेत...चीतेची राख सगळीकडे पसारली होती....आता मात्र सर्वजण घाबरले होते....पूर्ण गावात खळबळ उडाली होती.... पण या सर्व गोष्टींचा माझा पंजोबाचा घरावर काहीच परिणाम होत नव्हता...कारण त्या दिवशी त्यांचा घरात कोणीच नव्हतं म्हणून त्यांचा घरातून
त्या व्यक्तिला भाकरी मिळाली नव्हती...त्यामुळेच या सर्व गोष्टींचा सुगावा लागला...पण गावातील विचित्र प्रकार खूपच वाढले होते...गावात कायम कुबट वास येत होता...काही दिवसांनी तो विचित्र व्यक्ति गावाबाहेरील वडाचा झाडाला फाशी घेऊन मेलेला सर्वांना आढळला..... त्याच दिवशी गावात अचानक आग लागली...सर्व घर जळून खाक झाली फक्त पंजोबाच सोडून.. गावातील लोक खूप घाबरले आणि गाव सोडून निघून गेले....पूर्ण गावात स्मशान शांतता पसरली होती...पूर्ण गावात आता एकच घर शाबूत होत...पणजोबा एका बाबा कडे गेले त्या बाबांनी त्याला सांगितलं की 6-7 वर्षापूर्वी गावातील एकाने चोरी केली होती म्हणून त्या गावातील पंच लोकांनी त्याला खूप मारल...आणि गावातून वाळीत टाकलं....म्हणून तो बाहेर जाऊन काली जादू शिकून आला होता...त्याने
ही करणी केली होती..करणी केल्या नंतर लगेच त्याने गावाबाहेरील
वडाचा झाडाखाली आत्महत्या केली होती....कारण काली जादू त्याला पान सोडत नव्हती....त्याच ा त्याला पण त्रास होत होता...... त्या बाबांनी एवढाच सांगितलं की दर आमवस्येला त्या झाडाखाली त्याचा नावाने नैवद्य ठेवा...नाहीतर त्याची आत्मा बदला घेतल्या शिवाय राहनार नाही......तेंव्हा पासून आज पर्यन्त दर आमवस्येला घरातून नैवद्य जातो.... आज ते गाव फक्त वस्ती बनून राहील आहे...आणि फक्त सहा घर आहेत...ति पण विभक्त झालेली पंजोबाची पिढी आहे.......

No comments:

Post a Comment