Thursday, May 28, 2015

वाडा

मी जयंत माळी घेऊन आलोय एक खास भयानक कथा.
हि कथा दोन भागांत पोस्ट केली जाणार आहे
ही कथा पुर्णत: काल्पनीक असून
या कथेतील पात्रे , घटना , स्थळ यांचा कोणत्याही खर्या घटनेशी संबंध नाही. तसे आढळल्या तो निव्वळ योगायोग समजावा
कथेतील पात्रे :
1} रामराव चंद्रकांत पाटील ( माजी सरपंच )
2} विकास रामराव पाटील
3} सुखदा विकास पाटील
4} सचिन शर्मा
5} विनायक शर्मा
डोंगराच्या कुशीत वसलेले आई जगदंबेची कृपा असणारे करेवाडी गाव.
रामराव पाटील या गावचे माजी सरपंच. रामरावांना गावात भरपुर मान होता. रामरावांचा गावाच्या जवळ एक वाडा होता.
वाड्याच्या मागे विहीर होती.
वाड्यातील प्रत्येक खोली 20 खणांची होती. रामरावांचा एकुलता एक मुलगा विकास पाटील हा कर्नाटक मध्ये M.B.B.S च्या शेवटच्या वर्षाला होता. विकास जन्म होता क्षणीच त्याची आई स्वर्गवासी झाली होती. त्याचे शिक्षण पुर्ण होताच रामरावांनी त्याचे लग्न उरकले. खुप दिवसांनी वाड्यात शुभकार्य पार पडले. पण यानंतर येणार्या संकटाची चाहूल कोणालाच नव्हती.
विकासने गावतच एक रुग्णालय चालु केले.
त्यातच एका चांगल्या बातमीने संपुर्ण वाड्यात एकच आनंद पसरला ती बातमी होती विकास बाप होणार होता सुमीत्रा गरोदर होती पण जेवढी आनंद देणारी बातमी होती तेवढाच त्रास होणार होता
हे गुपीत गोष्ट फक्त रामरावांना माहीत होती.
रामराव पाटील यांनी केलेली चुक संपुर्ण कुटुंबाला भोगावी लागणार होती.
त्यांचेकडुन विकासच्या जन्मानंतर एक स्त्री गरोदर राहीली होती तो आळ स्वतःवर येऊ नये यासाठी त्यांनी त्या स्त्रीची वाड्यातील एक खोलीत हत्या करून तिला वाड्याच्या विहीरीत टाकले होते पण तिने मरता मरता त्या वाड्याला एक शाप दिला होता की " या वाड्यात यानंतर कोणताही वारस मी जन्माला येऊ देणार नाही तसेच त्या वेळी मी एकाच तरी बळी घेणारच तेव्हाच मी मुक्त होईन "
रामरावांनी ती खोली तेव्हापासून बंदच केली होती.
सुखदाचे गरोदरपणाचे पहिले चार - पाच महिने चांगले गेले.
रामरावांना वाटले त्या स्त्रीचा शाप खोटा ठरतोय पण तो एक जीवाच नव्हे तर दोन जीवांचा शाप होता.
सुखदाला सहावा महिना चालु झाला तस तसं तो शाप खरा ठरण्यास सुरुवात झाली होती.
सकाळीच सुखदाच्या अंघोळीच्या पाण्याचे रक्त झालेले पाहुन ती चक्कर येऊन स्नानगृहातच पडली.
त्या दिवशी रात्री ती 2 वाजता त्या विहरीच्या दिशेने जाताना रामरावांना दिसली रामरावांना कळून चुकले की तो शाप खरा ठरतोय.
रामरावांनी तिला लगेच अडवले.
दुसर्या दिवशी लगेच रामरावांनी गावातील मांत्रिकाला बोलावले त्याला सर्व सांगितले. त्याने वाड्यातील ज्या खोलीत स्त्रीची हत्या झाली होती ती खोली त्यांनी मंत्रांनी बंद केली पण त्याचा आता काही उपयोग नव्हता कारण त्या स्त्रीचा आत्मा जागृत झाला होता त्यामुळे त्या मांत्रिकाचा फार उपयोग झाला नाही.
दुसर्या दिवशी इकडे सुखदा निवांत बसली असताना तिच्या हातावर अचानक कशाचा तर वार झाला.
ती जोरात किंचाळली तिच्यावर लगेचच उपचार केले.
रामरावांनी हा प्रकार विकासला समजवला त्याला तो पटला सुध्दा त्याला लगेच त्याच्या कर्नाटकच्या काँलेज मधील मुळचे महाराष्ट्रीयन असलेल्या मित्रांची आठवण झाली.
सचिन आणि विनायक या दोघांना त्याने लगेचच फोन केला.
सचिन आणि विनायक दोघे सख्खे भाऊ दोघे PARANORMAL WORLD च्या अभ्यासात पटाईत अनेक वास्तुंचे दोष त्यांनी दुर केले होते.
दुसर्या दिवशी सचिन वाड्यावर आला.
रामरावांनी आणि विकासने संपुर्ण हकिकत त्याला समजावली. सर्व ऐकून तो थक्क झाला कारण आतापर्यंत असली केस त्याने सोडवली नव्हती.
इकडे सुखदावर त्या आत्म्याचा प्रभाव वाढत होता. सुघदाच्या सेवेसाठी ठेवलेल्या मुलीचा मृतदेह त्या खोलीबाहेरच टांगला होता.
तिची आत्महत्या नसुन ती हत्या होती. ती पण अगदी भयानक तिला मारले होते. संपुर्ण अंगावर छिद्रे होती तसेच तिचे डोळे बाहेर काढले होते.
त्या आत्म्या पहिला बळी घेतला होता. मुलीच्या हत्येमुळे प्रकरण आता पोलिसांत गेले होते.
सचिन ने रामरावांना ती खोली खोलण्याचा आग्रह केला पण रामरावांनी त्याला नकार दिला.
त्या रात्रीच विकास आणि सचिनने त्या खोलीचे कुलुप तोडून त्या खोलीत प्रवेश केला.
आत प्रवेश करताच सचिनला तेथे त्या दोघांशिवाय तिसरे कोणीतरी आहे याच अंदाज लागला त्याने लगेच MOTION SENSOR चालु केला. ( MOTION SENSOR हे एक PARANORMAL EQUIPMENT आहे की जे अदृश्य शक्तींची हालचाल समजावयाला मदत करते. )
त्याला त्या आत्म्याची हालचाल
विकासच्या मागे जाणवत होती
पण खुप उशीर झाला होता त्या आत्म्याने विकासच्या खांद्यावल वार केला होता. विकास इतका जोरत ओरडला होता की त्याचा आवाज संपुर्ण वाड्यात घुमला होता पण प्रत्यक्षात त्याचा आवाज त्या खोलीच्या बाहेर गेलाच नव्हता. सचिनने लगेच विकासला खोलीबाहेर आणले.
ती खोली उघडुन त्यांनी चुकच केली होती त्या चुकीचे परिणाम किती भयंकर होणार होते हे कोणालच माहित नव्हते.
दुसर्या दिवशी सकाळी रामरावांचे लक्ष त्या खोलीकडे गेले तर त्यांच्या लक्षात आले की कोणीतरी ती खोली उघडली आहे. ते चौकशी करायला विकासकडे गेले असता त्यांना सर्व समजले.
दुसरीकडे पोलिसांची चोकशी चालु होती.
रामरावांनी लगेचच त्या मांत्रिकाला बोलावून ती खोली बंद केली पण त्याचा आता काहीच उपयोग झाला नाही.
त्या मांत्रिकाने सांगितले की तुमच्या वाड्यात पहिली घटना घडली ती पोर्णिमेदिवशी घडली होती आणि या दुष्टचक्राचा शेवट येणार्या अमावस्येला होईल
सचिनला मांत्रिकाचे बोलणे पटले त्याने मांत्रिकाला मदत मागितली पण मांत्रिकाने त्या वाड्यात क्षणभरसुद्धा थांबण्यास नकार दिला.
तो गेला पण त्याच रात्री त्या मांत्रिकाचा पण त्या आत्म्याने बळी घेतला होता. त्या मुलीप्रमाणेच आता तो मांत्रिक मेला होता पण त्याचा मृत्यु त्याच्या घराला आग लागुन झाला होता पण त्या मृतदेह त्या वाड्यातील खोलीबाहेरच आढळला.
आता मात्र सचिनला चिंता वाटू लागली कारण अमावस्येला फक्त दोनच दिवस शिल्लक होते.
इकडे रामरावांना संशयित म्हणून अटक झाली होती.
सचिनने लगेच त्या भावाला म्हणजे विनायकला फोन लावला व ताबडतोब करेवाडीला यायला सांगितले आणि येताना PARANORMAL चे संपुर्ण साहित्य घेऊन यायला सांगितले.
विनायक लगेचच दुसर्या दिवशी हजर झाला.
विनायक आणि सचिन यांनी ती खोली उघडली आणि ते दोघे आत जाताच एक आकृती त्या दोघांच्या दिशेने आली पण त्या दोघांनी त्या आकृतीला चकवले पण आता मात्र सर्व वाड्याच्या वातावरणात फरक पडू लागला होता रात्रीचे अकरा वाजले होते कि अचानक त्या वाड्यातील LIGHTS बंद चालु होऊ लागल्या.
विकासला सुखदा जवळ बसवुन ती खोली त्यांनी पँक केली पण ती आत्मा आता संपुर्ण वाड्यावर राज्य करु पाहत होती तिला काहीही करुन वाड्याला वारस मिळू द्यायचा नव्हता
ती आत्मा जोरात चित्कार करत संपुर्ण वाड्याभर फिरत होती पण सचिन आणि विनायक यांना फक्त तिचे अस्तित्व जाणवत होते.
इतक्यात सचिनच्या पायावर जोरदार वार झाला सचिन जागेवर पडला.
सचिन पुर्णपणे रक्तबंबाळ झाला होता. सचिवर ताबोडतोब उपचार केले गेले.
अमावस्येचा दिवस उजाडला
विनायक ने एक ग्रंथात वाचून पुर्णपणे आत्माशांती पुजेचा बंदोबस्त केला.
तो पर्यंत सचिन आणि विकासने संपुर्ण वाड्यात TALCUM POWDER पसरली की जेणे करुन आत्मच्या पावलांची त्यांना खुण दिसावी.
नंतर त्यांनी सर्व वाड्यात EVP ( प्रेत आत्म्याच्या दिसण्यासाठी खास किरण सोडणारे मशिन ) बसवली लगेचच VIDEO CAMERA पण बसवला.
आज तो आत्मा पुर्ण शक्तीने वार करणार होता पण कितीही झाले तरी त्या आत्म्याचा शाप खरा ठरल्याशिवाय अथवा त्या आत्माच्या हत्यार्याला शिक्षा झाल्या शिवाय त्या आत्म्याला मुक्ति मिळणार नव्हती.
इकडे विनायकने आत्माशांती पुजेची तयारी केली होती.
चारी बाजूने त्याने एक विशिष्ट आकाराचे रिंगण काढले होते व त्याच्या बाहेर एक रिंगण काढले होते.
त्या बाहेरच्या रिंगणात तो आत्मा आणायचा होता.
इकडे रामरावांना घेऊन पोलीस वाड्यात आले होते.
वाड्यातील त्या आत्म्याच्या बाबतीतील घटनांची चौकशी करण्यासाठी.
रात्रीचे आठ वाजले होते रामराव आणि पोलिस खास विकासच्या आग्रहास्तव थांबले होते.
10 वाजता पुजेला प्रारंभ झाला.
पुजेला प्रारंभ होताच वाड्यातील वातावरण बदलु लागले. विनायकने सुखदा आणि विकासला पहिल्या रिंगणात बसवले व तो त्या दोघांपुढे बसुन मंत्र म्हणु लागला.
10:30 वाजता तो आत्मा बाहेर आला त्या आता आक्राळ असे रुप धारण केले होते आता मात्र ते सर्व पाहणार्या पोलिसांची खात्री पटली खरा गुन्हेगार तो आत्माच आहे.
वाड्यातील सर्व LIGHTS गेल्या होत्या बाहेर सोसाट्याचा वारा सुटला होता एरवी शांत वाटणार्या वाड्याचे रुप आता मात्र भयंकर झाले.
इकडे विनायकचे मंत्रोच्चार चालूच होते तर सचिन LAPTOP वर त्या आत्म्याच्या हालचाली टिपत होते.
ते सर्वच RECORD होत होते.
पण जे काही LAPTOP वर दिसत होते त्यावरुन तर सचिन गडबडूनच गेला कारण तो जिथे होता त्याच्यावरच तो आत्मा वार करायला येत होता त्याने लगेच त्याच्या जवळचा चाबुक काढला तो त्या आत्म्यावर उगारला तो आत्मा LAPTOP वर जाऊन आदळला. संपुर्ण LAPTOP चा चक्काचुर झाला होता.
आता मात्र तो आत्मा पुर्ण पणे स्पष्ट दिसु लागला होता.
आता मात्र विनायकने सर्वानांच आत येण्यास सांगितले पण आत जाता-जाता त्या स्त्रीने तिसरा बळी घेतला तो पोलिसाचा.
त्या पोलिसाचे मुंडके कापले गेले होते.
एखाद्याचा इतका भयानक मृत्यु पाहून सुखदा बेशुध्दच पडली.
त्या आत्म्याचा प्रवेश त्या पोलिसाच्या शरीरात होण्याआधीच त्या आत्म्याला शांत करावे लागणार होते.
विनायकचा विधी पुर्ण झाला आणि तो आत्मा नियोजित रिंगणाकडे खेचला जाऊ लागला .
तेथे पोहचताच त्या आत्म्याने खरे रुप धारण केले.
एक 28 वर्षाची रुपवान जिला पाहताक्षणीच कोणीही प्रेमात पडेल अशी ती स्त्री होती.
आता मात्र खरी परिक्षा होती.
विनायकने प्रश्न केला " का त्रास देत आहेस या सगळ्यांना ? काय पाहिजे तुला ? "
ती बोलली मला या पाटलांच्या वाड्याला वारस मिळू दयायचा नाहीये.
तेवढ्यात सचिन बोलला
" त्यावेळी जे काही झाले त्यात विकासची किंवा सुखदाची काहीच चुक नव्हती मग तु त्यांना का त्रास देत आहेस ? "
ती बोलली " एक तर रामरावाचा बळी घेईन किंवा सुखदाचा "
हे ऐकताच रामराव जागेवरुन उठले व त्या स्त्रीच्या रिंगणाकडे जाऊ लागले हे सगळेजण पाहत होते पण त्यांना अडवणे आता शक्यच नव्हते कारण ते विनायकच्या रिंगणाबाहेर गेले होते.
त्या सगळ्यांच्या समोर रामरावांचा अत्यंत घृणास्पद मृत्यु झाला त्यांचे संपुर्ण शरीर जळूण खाक झाले.
आता मात्र वाड्याचे वातावरण बदलले संपुर्ण वाडा आता शापमुक्त झाला होता.
दुसर्या दिवशी विनायक ने त्याचे एक गुढ सांगितले की रामराव जसे मरण पावले ते होणार हे त्याला माहीत होते पण त्याने आणि सचिनने फक्त रामरावांना त्यांच्या कृत्याची जाणीव आणि योग्य ति शिक्षा मिळावी यासाठी हे सर्व केले.
पण त्यांनी एक नव्हे तर दोन जीव वाचवले होते.
समाप्त :

No comments:

Post a Comment