Thursday, May 28, 2015

Sanjay Kamble
आज तब्बल पाच वर्षानी मी माझ्या मामाच्या गावी जाणार होतो. शेवट वर्षाच्या परीक्षा संपल्या होत्या आणि आठ दिवसावर माझ्या मामेभावाचे लग्न होते... college चे मित्र आता पुन्हा भेटतील न भेटतील, पन what's app वर सगळ्यांचे नंबर मात्र आठवणीने घेऊन ठेवलेले...सर्व मित्राची भेट घेऊन घरी परतलो..आणि प्रवासाची आवराआवर सुरु केली.
मामाच्या घरच्यांसाठी खाऊचा डबा माझ्या bag मधे ठेवत आई सांगु लागली.. " मामाला सांग, बाबांना सुट्टी भेटलेली नाही त्यामुळे आम्ही लग्नाच्या दोन दिवस आधी येतो म्हणून. " ..
" आई माझी इस्त्री केलेली कपडे....?" अस थोडस आईवर ओरडत मी डबा निट ठेवला आणि Bag हातात घेऊन आई बाबां आणी लहान बहीणीचा निरोप घेऊन बाहेर पडलो...
सायंकाळचे सहा साडेसहा वाजलेले.. महाराष्ट्र शासनाच्या S.T. ने माझा प्रवास सुरू झाला... शहराचे कोंदट वातावरण हळू हळू मागे पडू लागले. डोंगराळ भागातील वेड्यावाकड्या वळणावरून s.t धावत होती. गर्द झाडीतून सूटटेला मंद, गार वारा माझ्या शहरी मनावरचा ताण कमी करत होता. रस्ता तसा कच्चाच, अशाच खडकाळ रस्त्यातून मार्ग काढणा-या S.T. च्या खिडकीवरीला काचांचा खडखडणारा आवाज आणि त्या आवाजातही खिडक्यांमधुन येणा-या थंड वा-याची एखादी लहर मनाला सुखावून जायची. अशातही शांत झोपलेले काही लोक हे मला पंचतारांकीत हॉटेल मधल्या A.C. मधेही झोप न लागणा-या लोकांपेक्षा जास्त सुखी वाटत होते.
पण गावी जाण्यास मी इतक उतावळ असण्याच आणखी एक कारण होत...
माझी मैत्रिण.......
हो ....... मैत्रीणच.....
मैत्रीण की.....आणखी काही.....
लहान पणापासुनच,
जेव्हा मी गावी जायचो ती मला भेटायला खुप आतुर असायची. इतकीशी गोरी नव्हती पन साजरी, कपाळावर हिरव गोंदण, हनुवटीवर बारीकसा तीळ, टपोरे पाणीदार पन निष्पाप डोळे अशी ती........ 'गौरी'....
" पाव्हण... गाव आल तुमच...." कंडक्टर ने आपल्या हातातील तिकीटावर होल पाडायचे लोखंडी पंचींग खाडकन लोखंडी पाईप वर आपटले तसा मी जागा झालो.... आजुबाजूला पहात मी माझी bag उचलुन हातात घेत खाली उतरलो. मोबाइल पाहीला तर रात्रिचे 10.30 वाजुन गेलेले.
'टिन टिन' कंडक्टरने बेल मारली तशी खडखड आवाज करत धुळ उडवीत S.T. आपल्या मुक्कामाला निघाली...
माझ गाव अजुन बरच दुर होत.... आणि तिथपर्यन्त मला पायीच जाव लागणार होत... bag पाठीवर अडकवून एका चिंचोळ्या पायवाटेने माझा प्रवास सुरु झाला ... मामेभावाला फोन लाऊ लागलो पन 'IDEA network' .... शहरात बोंब, मग या खेड्यात कुठला network देणार.
पांढरशुभ्र चांदण्यात सगळ काही स्पष्ट आणि स्वच्छ दिसत होत.
गर्द दाट जंगल, वा-याच्या प्रत्येक झोक्यावर डोलणारी आंब्या, फणसाची झाडे, त्यांवर चमचमणारी, प्रकाशाचा खेळ करणारी लखलखणारी काजव्यांची माळ, किर्र्र किर्रर्रर्र किर्रर्रर्रर असे आपापसात संवाद साधणारे रातकिडे, आणि अशातच वाळलेला पालापाचोळ्यातुन सळसळत जाणारा एखादा काळाकुट्ट साप दिसताच काळजात धस्स्स्स्स व्हायच... अशा या निर्जन वाटेवर आज हेच माझे सोबती होते.
चालत चालत मी एका नाल्यावर तयार केलेल्या लाकडी पुलावर आलो.. उन्हाळ्याचे दिवस असल्याने पाणी खुप कमी झाल होत.तरीही चंद्रप्रकाशाने चमचमणारे ते संथ पाणी पाहुन न रहावून मी एक छोटासा दगड त्या पाण्यात टाकला, तशी या पाण्यात असंख्या वर्तुळे तयार होत किन-याकडे धाऊ लागली. ते मोहक दृष्य डोळ्यात साठवत आपली वाट चालु लागलो, पुन्हा भावाला फोन ट्राय केला पन network...
sshyyy....
पाठीवर आडकवलेली bag निट करत मोबाइल खिशात ठेवला..तशी माझी नजर काही अंतरावर असलेल्या एका ऊंच, दाट झाडावर गेली. त्या झाौडावर काजव्यांच्या लपंडावातच थोडी हलचाल जाणवली. मी आपल्या चालण्याची गती कमी करत निरखून ती हलचाल पहात चालू लागलो. जंगली माकडे किंवा तसेच एखादे जनावर असेल अशी मनाची समजुत काढत तसाच पुढे आलो. तोच पुन्हा त्या झाडावर हलचाल वाढली, मी मागे वळून पाहिल तस माझ्या पासुन पन्नस ते साठ फुटावर असलेल्या त्या झाडावरून काही तरी खाली पडल्याचे दिसले...
"अरे देव... बिचारा प्राणी ..." असे शब्द नकळत माझ्या तोंडातून बाहेर पडले. जागेवरच उभ रहात मी त्या पडलेल्या वस्तुची, प्राण्याची काही हलचाल होते का ते पाहू लागलो..ते तसेच पडून होते, निपचिप.
मी पुढे जाणार तोच त्याची किंचीत हलचाल दिसली मनाला थोड बर वाटल आणि मी आपल्या मार्गाला लागलो....तोच एका भयानक आवाजाने माझ्या काळजाचा ठोका चुकला...
"आSSSSSSS.......आSSSSSSSS......"
मानवी आवाजात जिवाच्या आकांताने ते कन्हत होते...
थोड विचित्र वाटल तस मी त्याकडे लक्ष न देता मागे वळून रस्ता धरला.... तसा वेदनेन कन्हत असल्याचा आवाज वाढु लागला... चालता चालता मागे वळून पाहिल आणि काळजाचा थरकाप उडाला...ती काळीकुट्ट आकृति जिवाच्या आकान्ताने असह्य वेदनेने कण्हत जमीनीवरून रांगत, सरपटत वेगाने माझ्या दिशेने येत होती... भीती वाटु लागली तशी खिशातून मोबाइल काढुन लाऊडस्पिकर वर गाणी सुरू केली. पन ती आकृति हळू हळू माझ्या जवळ येत होती.. मी ही झपाझप पावले टाकत न रहावून मागे पाहील तशी रांगत, सरपटत येणारी ती आकृति आता उभी राहीली ते ही माझ्या पासुन जेमतेम वीस पंचवीस फुट अंतरावर..
चंद्रप्रकाशात ती काळीकुट्ट माणवी आकृति,लांब गुडघ्या पर्यन्त हात, मोठे रागिट आणि क्रुर पांढरे डोळे स्पष्ट दिसत होती.... माझ काळीज जोरजोरात धडधडत होते... .. मी पन चालण्याचा वेग वाढवला, तशी ती काळीकुट्ट आकृति आणखी वेगात माझ्या दिशेने येत असल्याच जाणवू लागल... तीच रडण ओरडन चालूच होत.... "आsssssss आssssssss आssssssss.." अशा त्या ओरडण्यन सारा परिसर थरारला...माझा तर भीतीने प्राण कंठाशी आला, माझ्या काळजाची अधिकच धडधड वाढली...दरदरून घाम फुटला होता... पण वेग कमी न करता धाऊ लागलो..तोच जोराची ठेच लागून मी खाली पडलो आणि हातातला मोबाइल थोडा दूर पडला...मोठ मोठ्याने ओरडत, पालापाचोळ्यातुन झपाट्याने पावले टाकत माझ्या दिशेने येणारी ती आकृति आणि तीच्या चालण्याने वाळलेल्या झाडांच्या पानांची सळसळत यांनी माझ्या सर्व अंगावर सर्रर्रर सर्रर्रर्रर सर्रर्रर्रर्रर काटा येत होता..थरथरत्या हातानी खाली पडलेला मोबाइल घेऊन ताडकन उठून उभा राहीलो तस सगळच शांत झालं. अचानक ती आकृति कुठेतरी नाहीशी झाली होती...रडण ओरडण सगळ शांत झाल आणि पुन्हा तो रातकिड्याचा किर्र्र किर्रर्रर्र किर्रर्रर्रर असा आवाज तेवढाच चोहोबाजुला घुमू लागला.... मला आता इथुन लवकर गावात जायच होत... वाढलेले काळजाचे ठोकेह हळू हळू सामान्य होऊ लागले .. स्वताला या भयानक प्रकारातून सावरत पुन्हा मी माझ्या वाटेने पुढे सरकू लागलो..
अचानक हवेत गारवा जाणवू लागला... सगळ काही शांत होत, तोच मागुन एका मुलीची हाक ऐकु आली.....
" ये संजु........" मी दचकून जागेवरच ऊभा राहीलो .. तसा पुन्हा आवाज आला
"कित्ती वर्सान आलास र इकड....तुला माजी आटवन बीटवन यत हुती का न्हाय र.."
आवाज मी ओळखला होता...थोड हसलो पन थोडी गम्मत करायची ठरवुन मागे न पहाता मी म्हणालो....
" कोण हो आपन..... मी नाही ओळखले तुम्हाला..."
तशी ती थोडी रागात म्हणाली..
" शेरातली मानस तुमी...आमची आटवन कशाला यईल तुमास्नी..."
तीचा राग जाणवत होता, तसा मागे वळुन पहात मी म्हणालो....
"गौरी........गौरी........अजून नाही बदललीस..आणि इतक्या रात्रिची इथ काय करतेस....." ती ही उगाच घाबरेल म्हणून काही वेळ आधी घडलेल्या प्रकाराबद्दल काहीच सांगितल नाही.
ती माझ्यासोबत चालत म्हणाली .. "तुझ्या भावाच लगिन हाय न्हव... मला ठाव हुत, तु यनार ते, म्हणून तुजी वाट बघत होते."
बोलत बोलत आम्ही गावाच्या दिशेने चालु लागलो... दूर काही अंतरावरुन एक दुचाकी येताना दिसली तशी गौरी म्हणाली...
" चल कोनतरी येतय आपल्याला बगून नग ते समजायचे...आन तुज्या भावाच लगीन हाय तवा आपन रातच्यालाच भेटुया... न्हायतर परत लोक आपल्यावर नग त्यो संशय घेत्याली..."
बर म्हणत तीच्यकडे पहील तशी ती त्या काळोखात कुठेतरी नाहीशी झाली ....
समोरून येणारी दूचाकी माझ्या जवळ येऊन थांबली. "काय र... फोन तर करायचा... तु पोचलास का इचारायला आत्तीन फोन केला व्हता..." माझ्या मामाचा मुलगा थोडा रागवत बोलु लागल....
दोघे त्याच्या गाडीवरुन घरी पोहोचलो...जेवण आवरून सर्व गप्पा मारत बसलेले...
घरी पोहोचताच हे कसे आहेत, ते कसे आहेत .... नेहमीच्या formality...
जेवण आवरून रात्रि अंथरुनावर पडलो, काही वेळ आधी येताना इतकी भयावह घटना घडलेली असताना देखील फक्त दोन पावले सोबत चाललेल्या गौरीचा विचार मनातून जात नव्हता...ती अजून ही बदलली नव्हती.
तीच पाच वर्षा पुर्वीची गौरी..
तशी लहान असल्यापासुनच आमची मैत्री...मी येताच ओंजळ भरून करवंदे घेऊन यायची. दिवस भर आम्ही दोघे डोंगरावरून जांभळे, करवंदे खात हूंदडत फिरायचो. आंब्याच्या कच्च्या कै-या दगड मारून पाडायच्या आणि त्या खाण्यासाठी सोबत थोडी तीखट आणि मीठ ही खिशात असायच... पण कसे इतके जवळ आलो समजलच नाही. स्वता काट्यांमधुन वाट काढत माझ्यासाठी करवंदे जमवायची, स्वतासाठी नाही पण मला काटा लागला तर मनापासुन हळ हळायची. पण आता मीही तीला जपत होतो. तीला सोडून जावस वाटत नव्हत, रात्र कधी संपेल आणि कधी पुन्हा सकाळी या डोंगर द-यांमधुन हातात हात घालून फिरेन अस व्हायच....पण ही बालपनाची मैत्री कधी आणि कशी कुणास ठाऊक मैत्री प्रेमात बदलून गेली...
पन पाच वर्षापुर्वीची ती शेवटची भेट.. ..त्यावेळी मी सतरा वर्षाचा होतो आणि ती कदाचित माझ्या पेक्षा दोन वर्षानी लहान असेच गप्पा मारत चालत होतो " गौरी सुट्टी संपल्यात ग उद्या मला घरी जाव लागणार..." हसता हसता तीच्या डोळ्यात पाणी तरळले...ती एकदम शांत झाली... आपल्या हातात घेतलेला माझा हात झटकन सोडवत दोन पावले पुढे जात म्हणाली...
" संजु... त्ये बघ डोंगरावर ढग कस उतरल्याती..किती मस्त दिसतय..."
एक दिर्घ श्वास घेत ती म्हणाली..
" या धरणीमातेला भेटून ते पन असेच निघून जातेत....परतून येण्यासाठी ."
मी तीच बोलन मधेच थांबवत म्हणालो...
"गौरी... आज कदचीत आजची आपली शेवटची भेट असेल... आता वर्षभर नाही भेटता येणार.. .."
खुप उदास वटत होत पन थोडास धाडस करत मी तीला म्हणालो.... " तुला काहीतरी विचारायच होत...
तीचा हात हाती घेतला तशी ती थोडी लाजली. आणि पापण्या खाली झुकवत नाजुक पणे म्हणाली...
"...काय इचारायच होत ...."
थोड धाडस करत मी तीच्याकडे पहात बोलणार तोच मोटरसाइकिल वरुन सावकाराचा मुलगा आणि त्याचा मित्र आला...माझ्या हातात गौरीचा हात बघुन चिडला आणि मला थोड रागातच म्हणाला...
" ये पाव्हण्या..... काय नाटक चालु हायती रे..जीत्ता जाणार की पार्सल न ... "
मी काही बोलणार तोच गौरी त्याच्या वर चिडली...
" ये... काय करायच तुले... गप गुमान चालायच हीतन..."
त्यान चिडून गौरीकड पाहिल आणी म्हणाला.... "तुले तर मीच....."
पुढे काही बोलायच्या आत मी त्याच्या मुस्काटात हानली आणि तीथेच त्या सावकाराच्या मुलासोबत झटापट लागली...
धापकन पलंगावरून खाली पडलो तशी जाग आली.. सकाळ झालेली....पाच वर्षापुर्वी घडलेले सर्व जसेच्या तसे आठवत होते...
लग्नाचे घर असल्याने जो तो आपापल्या कामात. गौरी ला भेटता येणार नव्हत कारण पाच वर्षापुर्वी सावकाराच्या मुलाशी झालेल्या भांडणामुळे मामाने मला इकडे न येण्याची ताकीद केलेली... म्हणजे आता तीला नेहमी प्रमाने भेटण्याचा प्रश्नच येत नव्हता....
दिवस कसातरी पुढे ढकलत संपला आणि रात्र पडायला लागली... शेजारच्या गावांमधे यात्रा, जत्रा सुरु होत्या रोज जवळ पासच्या एखाद्या गावची यात्रेसाठी आर्केस्ट्रा, तमाशा, कलापथक असे कार्यक्रम असायचेत...
मी पन मस्त फ्रेश होऊन यात्रेच निमीत्त सांगुन घरातुन बाहेर पडलो... माझी पाऊले आमच्या ठरलेल्या ठिकानाकडे निघाली.. वाटेतच त्या सावकाराच घर होत.. आणि नेमका पत्रिका वाटत भाऊ तीथेच आला होता... मला पाहताच त्याने हाक मारली .... मला जायच नव्हत पन शेवटी नाईलाज, जाण भाग होत त्यांनी आत यायला सांगितल तसे आम्ही आत सोफ्यावर बसलो... हातात गरम चहाचा कप देत नेहमीच बोलन सुरू झाल...मी शांतपने चहाचा आस्वाद घेत होतो, पन माझी नजर सावकाराच्या घरभर फिरत होती...
प्रशस्त घर, .... घर कसल आलिशीन वाडाच तो..भल मोठ अंगन, पुढे समोरच गावठी पद्धतिचा 'माच्या'..... त्यावर सत्तरीच्या आसपास वय असणारे सावकार आडकित्याने सुपारी फोडत माझ्या भावाला म्हणाले.. "पोरा...कंच्या गावची न्हवरी म्हणायची...." वय झालेल पन अजुनही करडा आणि भरदार आवाज. त्यांच बोलन चालु होत. समोरच्या भिंतीवर एका म्हातारीचा फोटो होता, सावकाराची बायको असावी कदाचीत. आणि तीच्या बाजुला आणखी एक फोटो. फोटोला घातलेल्या हारामुळे चेहरा नीट दिसत नव्हता... त्यांच बोलन तसच ठेऊत मोबाइलची रिंग वाजवून मी फोन आल्याच नटक करून बाहेर पडलो... आणि भावाची गाडी घेऊन थेट गौरीला भेटायच्या जागी...गाडी खाली लाऊन मी वर आलो....
काही अंतरावरच ते दैत्याकार वडाच झाड गौरी आणि माझ्या भेटीची साक्ष देत होत होत, त्याच्या पारंब्या जमीनीपर्यन्त पोहोचलेल्या. त्या झाडावर नजर पडताच वाटायच की एखादा शक्तिशाली दैत्य डोळे बंद करून देवाची तपश्चर्या करत बसलाय... आणि वहाणा-या मंद वा-या सोबत डोलत देवाशी संवाद साधतोय...
शेजारच्या मोठ्या दगडावर बसुन आजुबाजूला नजर फिरवून गौरीचा वेध घेऊ लागलो...
ती अजुन आली नव्हती , मी तसाच मोबाइल वर गेम चालु केली.. तोच एक थंड वा-याची लहर अंगाला स्पर्श करुन गेली... झाडावर पानांचा सळसळ वाढलेली जाणवत होती. मोबाइल खिशात ठेवत पुन्हा तसाच आजुबाजूला पहू लागलो..
काल सारखच शुभ्र चांदण पडल होत... गाव खुप दूर, खाली डोंगराच्या पायथ्याशी राहिलेल. शुभ्र चांदण्याच्या प्रकाशात गावाचे चित्र अतिशय सुंदर दिसत होत, सावकाराचा प्रशस्त वाडा सोडला तर बाकी छोटी छोटी घर, कुठेतरी एखाद्या घरातुन बल्ब चा पिवळसर प्रकाश घराच्या अंगणात पसरलेला होता आणि त्यात हूंदडणारी काही छोटी मुल, एखादी माऊली घराच्या मगे रचलेल्या छोट्याश्या चुलीवर भाकरी थापत होती. त्या चुलीत फूंकर मारताच धुराची पांढरट रेषा वर वर आकाशात जात सामावुन जायची..... अचानक माझ्या पासुन काही अंतरावरच्या त्या भल्या मोठ्या वडाच्या झाडाखाली काही हलचाल होत असल्याच जाणवल तस थोड निरखून पाहू लागलो. पण नीट काही दिसत नव्हत. थोड पुढ जात मी पाहील कोणीतरी तीथ असल्याच जाणवल, कदाचित गौरी माझी मस्करी करत असेल म्हणून सौम्य आवाजात हाक दिली..
" गौरी ............ ए गौरी ........."
तशी त्या दैत्याकार वटवृक्षामागुन एक माणवी आकृति किलकील्या नजरेने माझ्याकडे पहात असल्याच जाणवल... पन ती आकृति पुरुषाची होती... असेल कोणीतरी म्हणून मी मागे येत पुन्हा त्या दगडावर बसून मोबाइल सुरू केला आणि तीरक्या नजरेने त्या झाडाकडे पाहू लागलो..
ती माणवी आकृति आता झाडामागून पुर्ण बाहेर येऊन उभी माझ्याकडे पहात होती... मी पन त्याच्या कडे पाहू लागलो, तसा मनात एक विचार चमकुन गेला की काल रात्रि हीच आकृति माझ्या मागे लागलेली आणि सर्रर्रर्रर्रर्र कन अंगावर काटा आला... ते कोणतीही हलचाल करत नव्हते तरी माझ्या डोळयाच्या लवणा-या पापणीसोबत ते पुढ येत असल्यासारख वाटु लागल. पापणी मिटुन उघडली की अंतर कमी होऊ लागले... खुपच विचित्र वाटू लागल तसा मी तीथुन जायच ठरवल. तोच मागुन एक हाक ऐकु आली... आणि माझ अंग शहारल
"संजु...... " थंड वा-याची एक लहर अंगाला स्पर्श करून गेल्यासारख वाटल..
तो गौरीचा आवाज होता... मी मागे वळतच म्हणालो...
"गौरी ........ किती उशीर ग......."
म्हणत मी मागे वळुन पाहील तस धक्काच बसला, मागे कोणीच नव्हत.. मग तो आवाज कोणाचा होता... आता मात्र भीती वाटु लागली होती... मनात नको नको ते विचार येऊ लागलो... तीथुन निघुन जायचा विचार केला, पन मी गेल्या वर गौरी आली तर .... नको थोड़ा वेळ वाट पाहण्याचा निर्णय घेतला... आणि पुन्हा त्या मोठ्या दगडाला तक्या देत हळुच चोरट्या नजरेने वडाच्या झाडाखालची ती आकृति दिसते का ते पाहु लागलो... आता त्या वडाच्या पारंब्यांमधे जोरजोरात हलचाल होत असल्याच दिसत होत...कोणीतरी पारंब्या जोरजोरात हालवतान दिसल, दबक्या पावलानी पुढ जात पाहण्याचा प्रयत्न करू लागलो... समोरच द्रुश्य पहाताच काळजाचा ठोका चुकला... ती काळीकुट्ट माणवी आकृति खाली डोके करून आपले पाय वर झाडाच्या पारंब्या मधे अडकवून जोरजोरात हेलकावे घेताना दिसली, कधी गर्र कन गिरकी मारायची. तर कधी आपल तोंड पसरून कण्हायची.. समोरच ते चित्र पहाताच अंगावर शहारा आला... मी त्याला पहात दबक्या पावलानी मी मागे सरकु लागलो तशी त्याने आपली नजर माझ्यावर रोखली आणि त्यान हेलकावे घेणे बंद केले...
काही हलचान न करता ते आपल्या किलकील्या डोळ्यानी एकटक माझ्याकडे पाहू लागले... मी ही श्वास रोखुन एकटक समोर पाहु लागल ... एका सेकंदासाठी डोळ्याची पापनी लवली आणि ती आकृति कुठेतरी नाहीशी झाली... पन दुस-या क्षणी ती
काळीकुट्ट माणवी आकृति माझ्यापासुन थोड्याच अंतरावर कोणतीच हलचान न कारता तशीच उभी दिसली आणि काळजाचा ठोका चुकला .. चंद्रप्रकाशात ती काळीकुट्ट आकृति, लांब गुडघ्या पर्यन्त हात, लांब लालसर नख्या, मोठे रागिट आणि क्रुर पांढरे डोळे. त्याला पाहताच माझा मागे तोल गेला आणि खाली पडलो... एखाद्या काळ्या मांजराने घुरघूरताना आपला जबडा पसरावा तसा त्या पिशाच्च्याने माझ्या कडे पाहून आपला जबडा पसरला. त्याचे लाल पांढरे टोकदार रक्तळलेले दात पाहुन काळजाचा थरकाप उडाला... श्वास वाढला, काळीज जोरजोरात धडधडत होत... तोंडातून शब्दच फुटत नव्हते... जागेवरच उभे रहात त्याने आपली भयानक नजर माझ्यावर रोखली होती .. काय करावे सुचत नव्हते... इतक्यात मागुन एक भयानक किंकाळी ऐकु आली. शरीरातला उरला सुरला प्राण निघुन जावा तसा थरारलो...
तो आवाज गौरीचा होता... ती जिवाच्या आकांताने ओरडत मला हाक मारत होती... तीच्या आवाजात भयानक वेदना होत्या...
थरथरत उठून उभा राहीलो, पन ते पिशाच्च कुठेच दिसत नव्हते... तसाच मी गौरीच्या आवाजा मागे धाऊ लागलो... पडत झडत मी त्या गर्द दाट झाडीतून जाणा-या त्या बारीकशा पायवाटेने धावत निघालो..ती जोरजोरात ओरडत होती... एखाद्या निष्पाप जनावरास लाठीने, चाबकाने फोडताना जसे ते हंबरावे, ओरडावे तसा गौरीचा काळीज पिळवटून टाकणारा आवाज कानावर पडत होता, आणि काळजात धारधार कट्ट्यार उतरावी तशी मनाला यातना होत होती... धावता धावता डोळ्यातून पाणी कधी आल कळलच नाही... हूंदका आवरून जीवाच्या आकांताने घनदाट जंगलातुन धावत गौरीला साद घालत तीचा शोध घेऊ लागलो, पण तीचा आवाज आणखी दुर दूर जाऊ लागला... अर्धा पाऊण तास तसाच धावत राहीलो पण गौरी कुठच दिसत नव्हती... खुप दम भरला होत. अंगही घामान भिजल होत. तसाच एका झाडाला तक्या देऊन उभा राहीलो..गौरीला साद घालून घसा सुकला होता... काळीज जोरजोरात धडधडत होते...आणि डोळ्यातून एकसारखे अश्रु वहात होते.. स्वाता:ला सावरत चोहोबाजुला नजर फिरवून पाहील पन काजव्यांची लखलखनारी माळ आणि रातकिड्यांची किर्रर्रर्रर्रर किर्रर्रर्रर्रर किर्रर्रर्रर्रर असा कर्कश्य आवाज एवढ होत... गौरी कुठेच दिसत नव्हती...
डोळ्यातील अश्रु पुसत पुन्हा तीचा शोध घेऊ लागलो. तोच असह्य वेदनेन कण्हत असल्याचा गौरीचा आवाज आला...
"स..............स..............संजु........"
तो गौरीचा आवाज होता.
" गौरी..........गौरी.........कुठ आहेस तु......"
केवीलवाण्या आवाजात साद घालत मी तीचा शोध घेऊ लागलो... डोळ्यातून एकसारखे अश्रु वहात होते..तीचा आवाज येईल त्या दिशेने पुन्हा धावणे सुरू केले...
पुन्हा तीची हाक ऐकु आली... तसा जागेवरच थांबून तीच्या आवाजाचा वेध घेऊ लागलो... तोच उजवीकडे काही अंतरावर झाडाच्या वाळलेल्या पानांवरून कोणीतरी फरपटत जात असल्यासारख जाणवल.. मी नजर फिरवली आणि काळजाचा थरकाप उडाला...
गौरी खाली जखमी अवस्थेत विव्हळत होती.. तीच्या जखमातून रक्त एकसारख वहात होत... कपडे ठीक ठिकानी फाटलेले... सर्व अंगच रक्ताने भीजलेले होते... तीची ही अवस्था पाहुन अंग शहारल, मी तीच्याकडे धावणार इतक्यात ती काळी आकृति गौरी शेजारी उभी दिसली... ते गौरीचा हात पकडून फरपटत तीला घेऊन जाऊ लागले... ती रडत, विव्हळत होती.. माझ्याकडे पहुन कण्हतच बोलु लागली...
"स......स.......संजु.......तु जा इथुन... नाहीतर हे त....त....तुलापन ठार मारील...."
आता मात्र रागाने मी वेडा झालो होते... कमरेला लावलेला चामड्याचा बेल्ट काढला आणी अंगातली सारी शक्ति एकवटली..हाताच्या मुठीत बेल्ट करकचुन आवळतच मी त्या पिशाच्च्यावर ओरडलो...
"ए.............सोड तीला............" म्हणत रागातच चालू लागलो....
माझ्या कडे पाहून चेहरा आक्राळ विक्राळ करत ते भयान, भरड्या आवाजात हसु लागले... भीतीने थरारलो पन जख्मी गौरीकडे पहात मी रागातच त्याच्याकडे चालू लागलो...
तोच कोणीतरी मला मागुन पकडल, मी काही बोलणार तोच आपल्या हाताने माझ तोंड दाबल, मी प्रतिकार करणार इतक्यात मागून बारीक आवाज कानावर आला...
" शुssssssssssss....इथच थांब... एकही पाउल पुढ टाकु नग..आन काय बी बोलू नग..."
आवाज ओळखला तस मी गर्रर्रर्रर कन मागे फिरलो...
" ग........ग.....गौरी......तु..."
तीला पहाताक्षणी तीला गच्च मीठी मारली, माझ्या डोळ्यातुन घळाळा आनंदाश्रु वाहु लागले... ती ठीक होती..
दुस-याक्षणी मनात विचार आला, मग ती जखमी आहे ती कोण...? तसच समोर पाहिल. ती जख्मी अवस्थेत पडलेली मुलगी गाडीचा स्टर्टरच्या आवाजासारखी हसत उठुन उभी राहीली. र्खी खी खी खी, तीचा चेहरा विद्रुप होऊ लागला तसा मी हादरलो...
गौरीन माझा हात मागे ओढला आणि आम्ही दोघे गावाच्या दिशेने धावत सुटलो. पडत होतो, धडपडत होतो पन एकमेकांचे घट्ट पकडलेले हात आम्हाला सावरत होते... तसच कोणीतरी वेगात आमच्या मागे धावत असल्याच जाणवल... मी मागे पहाणार तोच गौरी ओरडली......
"माग बगू नग....." दोघेही जीवाच्या आकांताने धावत सुटलो...
माझी गाडी रस्त्यावर दीसली तसा सुटकेचा नि:श्वास टाकला... ती ही दमली होती आणि मी तर धापा टाकत होतो...
जोरजोरात श्वास घेत ती म्हणाली ...
" सारी......( sorry).. मला जरा यायला यळच झाला...एक बी पाऊल पुढ टाकल आसतस तर त्या पिशाच्च्यान तुजा जिव घेतला आसता..."
मी गुडघ्यावर हात ठेऊन धापा टाकत तीच्याकडे पाहीले, घडल्या प्रकाराची थोडी भीती होतीच पन एकमेकांकडे पाहुन आता आम्हाला हासु ही येत होत...
शुभ्र टपोर चांदण . तेच टीम टीमनारे काजवे.. कुठूनतरी रातराणीच्या फुलांचा योणार सुगंध मनावरील ताण कमी करत होता आणि अशातच चंद्राच मोहक रुपही फिक वाटाव अशी ही माझी गौरी...
घडलेल्या प्रसंगातून थोड normal होत तीच्या जवळ आलो... ती तशीच उभी होती...माझ्या थरथरणा-या हातात तीचा हात घेतला तशी काळजाची धडधड वाढली होती...तरीही धाडस करत तीला सांगितल,
" गौरी.........मला तु खुप आवडतेस...."
तीच ही अंग थरथरत होत...नाजुकस गालात हसत तीन मान झुकवत फक्त 'हं' केल.
तीचा हात आपल्या दोन्ही हातानी घट्ट पकडत म्हणालो..
"गौरी.........माझ तुझ्यावर खुप प्रेम आहे ग... मला आयुष्यभर अशीच साथ देशील......माझ्याशी लग्न करशील....."
तीने शांतपने आपले डोळे मिटले तसा तिच्या पाणावलेल्या डोळ्यातुन एक थेंब माझ्या मनगटावर पडला... तीच्या चेह-यावर एक समाधान दिसत होत...
माझ्याकडे पहात ती म्हणाली..
" पाच वरीस म्या या दिसाची बगत हुती..
मला ठाव हुत तु परतून यणार... माजा देव माज्यासोबत एवढा निर्दयी न्हाय वागनार...."
बोलता बोलता तीला अश्रु अनावर झाले तशी ती माझ्या गळ्यात पडून ढसाढसा रडतच म्हणाली..
"माजा बी लय जीव हाय तुज्यावर... पर तुला बी ठाव हाय आपल लगीन न्हाय व्हणार...तुझा मामा काय म्हणाला होता आठव.."
तीच बोलण थांबवत मी म्हणालो...
" मला तुझ्याशीच लग्न करायच आहे....मग जीव गेला तरी चालेल... मी उद्याच माझ्या आईला सांगतो आणि तुझ्या आईसोबत बोलणी करायला सांगतो..."
माझ बोलण ऐकताच ती घाबरली आणि घरी न येण्याची विनवणी करू लागली..माजी आन हाय वगैरे वगैरे..पन तीच काही ऐकण्याची मला गरज वाटली नाही. तीला गाडीवर बसवले आणि मुद्दाम सावकाराच्या घराजवळुन आलो. 

आर्केस्ट्रा बघून येणारी लोक, स्त्रीया मुल रस्त्याने चालत येत होती... तिला गाडीवरुन तीच्या घराजवळ सोडली आणि दोन मिनट गाडी थांबवून बोलत उभ राहीलो कारण सावकाराच्या मुलाचे दोघे मित्र काही अंतरावर बोलत उभे होते...
घरी आलो एव्हाना रात्रिचे दोन वाजलेले... थोड जेवण करून अंथरुणावर पडलो. आज खूप खुश होतो... उद्या आईला सांगायच की मला गौरीशी लग्न करायच आहे, पन मामाला काही समजू द्यायच नाही. गौरी बरोबरच्या नव्या आयुष्याची स्वप्न पहातच झोपी गेलो...
सकाळी आईला फोन करून गौरी बद्दल सांगितले. पालकांच्या चौकशी की चौकस स्वभावाप्रमाणे कोण आहे ती, वडिल काय करतात, कोणती जात, कोणत कुळ वगैरे प्रश्नाचा भडिमार सुरू झाला..
त्या नंतर सर्व मित्राना फोन केला आणि जर घरचे लग्नाला नाही म्हणनार ठाऊकच होत त्यामुळे पुढची फिल्डिन्ग लावायला सांगितले, सगळे खुश होते... शेवटी मित्रच ते, सुखा:ता आणि दु:खात साथ देणारे..
कधी सुर्यास्त होतो आणि कधी गौरीला हे सांगतो अस झालेल, रात्र झाली तस आणखी एक कारण देत मी बाहेर पडलो... गाडी उभी करून मी वर आलो. ती वाट पहात बसलेली... मला पाहून परत आपल्या ओढणी सोबत खेळ करू लागली.. आज थोडी रागातच होती... मी आणलेला गजरा फेकुद देत म्हणाली...." मला लग्न करायचे नाही... "
... तस मी म्हणालो, " सावकाराच्या मुलान घरात येऊन धमकी दिली काय घरच्याना..."
" तु कायपन समज..."
तसा मला राग आला आणि म्हणालो..
" तुला माझी शप्पथ... नाही सांगितलस तर माझ मेलेल तोंड पन तुला पाहायला भेटणार नाही..."
माझ बोलण ऐकताच गर्रर्रर्र कन मागे फिरली आणि माझ्या गालावर चपाट मारली...
"सत्य ऐकायला आणि ते सहण करायला, तस काळीज हाय तुझ्याजवळ...आन ते सत्य समजल, तर तु स्वताच लग्नाला न्हाय म्हणशील..."
ती काय बोलत होती काहीच समजत नव्हत. 'सुटल्या' म्हणून ती माझ्या जवळ येत मला घट्ट बीलगली. आज ती खुप वेगळी भासत होती जणु या आयुष्यातली ही शेवटचीच भेट. तीच्या बोलण्याचा अर्थ उमगत नव्हता... मी पन विचार केला, 'मला हीच्यासोबतच लग्न करायच आहे बाकी गेल खड्यात...' नितळ चांदण्याची ती रात पुढे सरकत होती आणि गौरी तशीच माझ्या कुशीत आपले डोळे मिटून पडून राहीली...मी ही तीच्या मोकळ्या केसामधून हात फिरवत आपल्या भावी आयुष्याची स्वप्न रंगवत होतो,
पन एक भयान सत्य आमचा पाठलाग करत होत...
सकाळी माझ्या मामेभावासोबत त्याच्या room मधे बोलत बसलो होतो ... "सावकाराच्या मुलाची नाटक वाढलेत...त्याला एक डोस द्यायलाच पाहीजे.."
मी आरशात केस निट करत म्हणालो... तसा भाऊ बाजूला चार्जींगला लावलेला मोबाइल हातात घेत म्हणाला..
" त्या सावकाराला पाच मुल आहेत, तुला कनच्यान त्रास दीला.."
तस त्याच्याकडे न पहाता मी म्हणालो,
" ज्यासोबत आधी माझी कचकच झालेली..."
भावाने भुवया ऊंचवत माझ्याकडे पाहील, आणि म्हणाला..." तु तयार हो... थोड बाहेर जायच आहे ..."
फ्रेश होऊन दोघेही बाहे पडलो, गाडीवर पाच मिनीटात सावकाराच्या दारात आलो...
मी म्हणालो..."अरे... आता लोचा नको...तुझ लग्न ठरलय.. नंतर बघू...." मला काही उत्तर न देता तो आत गेला...सोबत मी ही गेलो...
सावकाराचा मोठा मुलगा गुरांसाठी आणलेली वैरण टाकतच भावाला म्हणाला..
" काय र भिकाजी .... सकाळ सकाळ....!"
" काय न्हाय.... आबाची तब्बेत कशी आहे विचाराव म्हटल...."
तसा भावाने मला खुनावत समोरच्या भिंतीवरचा फोटो दाखवला... तो हार घातलेला फोटो सावकाराच्या त्याच मुलाचा होता, मी दचकुन उभा राहीलो आणि वेगात तीथुन बाहेर आलो...पाठोपाठ भाऊही आला...
मी आश्चर्यान भावाला म्हणालो.." कसा आणि कधी मेला हा..."
तसा भाऊ म्हणाला.." दोन वरीस झालीत.. accident झालेला. याच्याच शेतातला उसाने भरलीली ट्राली पायावरून गेली..पायाचा चेंदामेंदा झाला... दोन्ही पाय गेलत... वरीसभर जीत्ता होता... रांगतच घरभर फिरायचा. जोरजोरात कण्हायचा, आरडायचा चार पाच वेळा आत्महत्या करायचा प्रयत्न केला पन वाचला..मग एकदा शेतातल किटनाशक प्यायला. लय तळमळत हात बोट घासत हुता.. दोगजन मोटरसाइकिल वरन दवाखान्यात न्हेत व्हती... पन गावाबाहेरच्या नाल्यावर त्याला झटका आला तिघबी खाली पडलीत... सावकाराच पोरग तीतच आरडून आरडून मेल..." भावाच बोलन ऐकुन धक्काच बसला...सर्रर्र्रर्र कन अंगावर काटा आला... झटकन लक्षात आल म्हणजे त्या रात्रि मला दिसला तो सावकाराच्या मुलाचा आत्मा होता. मी भावाला म्हणालो " मग ती मला खोट का बोलली..."
भाऊ गाडी चालवत विचारु लागला..
"कोन ती..."
"ती गौरी.....हा सावकाराचा मुलगा मला त्रास करतो म्हणाली..."
भावाला माझा खुप राग येतोय अस वाटत होत..
तो वैतागुन म्हणाला..."अर..डोक बीक हाय ना जागेवर..."
त्यान गाडी सरळ गावात आणली ती गौरीच्या दारात...
मी त्याला म्हणालो " अरे आता तुझ डोक ठिकाणावर आहे का...इथ कशाला आणलस...."
माझ्याकडे पहातच त्यान हाक दीली...
" मावशी....ये मावशी...."
तशी गौरीची आई बाहेर येतच आपले दोन्हा हात आमच्या समोर जोडत केविलवाण्या नजरेने बोलू लागली...
" या की र लेकरानु ... "
ती आम्हाला आत घेऊन गेली... " गौरीच घर खूपच छोट होत.एक छोटीशी पाल्याची झोपडी... आत देवाची गाणी म्हणायचे साहीत्य, टफ, तुणतूणा. लाकडाने विणलेल्या दुरडीत भंडारा लावलेली देवीची मुर्ती...
" बोला की र लेकरानू..काय काम हूत..."
भाऊ बोलू लागला.." मावशी काल लग्नाची पत्रिका दीली ना...देवीला नमस्कार करायला आलोय..." म्हणत त्यान देवीच्या मुर्तिपुढ डोक टेकवल.. गौरीच्या आईने तीथलाच थोडा भंडारा आम्हा दोघाच्या कपाळाला लावला.
मागे भिताडाला तक्या देत भाऊ म्हणाला, " मावशी ..... गौरीचा काही फोन, वगैरे येतो का..."
आमच्या हाती चहाचा कप ठेवत त्या म्हणाल्या "न्हाय र लेका......तीन चार वरीस झाली, कायबी सुगावा न्हाय तीचा..कुठ हाय..कशी हाय..कायबी ठाव न्हाय..." गौरीच्या आईन आपल्या देवीला हात जोडले आणि म्हणाल्या "जीत बी हाय तीथ माज्या लेकीला सुखी ठेव ग आई.." बोलता बोलता त्यांच्या डोळ्यात पाणी आल... त्यांच बोलन मला काहीच समजत नव्हत...आम्ही दोघे त्या माऊलीचा निरोप घेऊन बाहेर पडलो...
गाडीची किक मारत भाऊ म्हणाला, " पाच वर्षापुर्वी तुझ आणि गौरीच लफड हाय अस सावकाराच्या पोरान गावभर केल. गौरी पळून जाऊन लगीन करल, गावची आन तीच्या घरची परंपरा मोडल म्हणून गावसभा घ्यायला लावली...बिचारी गौरी प्रत्येकासमोर हात जोडत होती र... मला हे न्हाय करायच अस रडून रडून सांगत व्हती पन कुनीबी ऐकल न्हाय...आठ दिसानी गावाच्या देवळात देवासोबत तीच लगिन लावल...आणि तीच्या आईप्रमाण तीलाही 'देवदासी' बनवण्यात आल... नाईलाजान ती दारोदारी जाऊन जोगवा मागायची,देवळात देवाची गाणी म्हणायची... जेव्हा आपल्या घरी जोगवा मागायला आली की मला आठवणीन इचारायची की.....' संजु कसा हाय र, कदी मला इचारतो का त्यो..' मी होय म्हणालो की ती फुलासारखी उमलायची, आणि निघून जायची.. गावची मुल तीला घाणघाण बोलायचीत...एकदा ती जोगवा मागुन घरी चाललेली, सावकाराचा मुलगा आणि त्याच्या दोस्तानी गाडी तीच्या आडवी लावली आणि म्हणाला...' तु कीतीबी नाटक कर..तुला म्याच कुस्करणार' त्यावर ती इतकी चिडली की त्या सावकाराच्या पोराच्या शर्टचा कॉलर पकडून मरत होती...त्या नंतर काही दिवसानी ती यायची बंद झाली...
गावात चर्चा सुरू झाली की ती कुणाबरोबर तरी पळुन गेली...."
भावाच बोलन ऐकून डोक्यात लाल मुंग्यांच वारूळ उठल... लक्षात आल की त्यामुळेच ती गावक-यांच्या त्रासाला कंटाळुन जंगलात रहात असावी... मनाशी निश्चय केला काही झालं तरी तीला या नरकातून बाहेर कढून आपल्या सोबत घेऊन जायच...
शांतपने भावाला म्हणालो.." गौरी इथच आहे, या जंगलात रहाते. लोक त्रास देतील म्हणून ती गावात येत नाही...आज तु सोबत चल... आणि हो... मी लग्न करणार आहे तीच्या सोबत....वाट्टेल ते झाल तरी..." अस म्हणत त्याच्या पाठीवर थाप दिली... माझ बोलन ऐकुन तो मात्र अस्वस्थ झाल्यासारखा वाटला...
रात्र झाली तस आम्ही दोघे बाहेर पडलो..
मी खुपच उतावळा होतो...माझ बडबडण भाऊ मात्र शांत बसुन ऐकत होता....
आम्ही नेहमीच्या ठीकाणी आलो तस भावाला गाडी लावायला सांगुन मी धावतच वर गेलो... गाडी लाऊन तो ही माझ्या मागे आला...
गौरी अजुन आली नव्हती. त्या दगडाला तक्या देत मी भावाला सांगु लागलो.. "हे बघ आम्ही इथच भेटतो पन इथ एक भयानक अनुभव पन आला, एक भयानक आकृति दिसलेली रे.. पन आता तु घाबरू नको, तुझ्या सोबत मी आहे ना...."
आणि मी त्याला माझ्या जवळचा धारधार चाकू दाखवत म्हणालो....."हा बघ चाकु... त्या घटने नंतर या गावात तर हत्यार पाहीजे अस वाटल..." वेड्यासारखा मी एकटाच बडबडत होतो भाऊ मात्र माझ बोलन ऐकत शांत उभा होता...
कदाचित आज पौर्णिमा असेल... चंद्र आज भरात आला होता...रात्र पुढे सरकत होती पन अजुन गौरी आली नव्हती त्यामुळे खुप अस्वस्थ वाटत होत.. खुप वेळ वाट पाहिली पन तीचा काहीच पत्तच नव्हता तेव्हा भाऊ म्हणाला..."चल.....निघुया आता....कदाचित आज ती येणार नाही...." त्याच बोलन मधेच थांबवत हसुन त्याच्याकडे पहात मी म्हणालो...
"तीचा जीव आहे माझ्यावर....ती बघ मागे......गौरी उभी आहे..."
भावाचा हात दबत मी गौरी जवळ जात तीला म्हणालो...
" काय madam.....किती हा उशीर...कोणाला वेळेची कदरच नाही म्हणून आपला देश मागे आहे ..." गौरी तशीच शांत उभी होती...तीच्याकडे पहात मी पुन्हा बोलू लागलो..
" आपण लग्न करणार आहोत हे भावाला सांगितलय...आता तुला कोणालाही घाबरायची गरज नाही...आणि जर कोण काही म्हणाल तर मी तीथच उसाच्या पेरा सारख कंडक करतो..."
मी भावाकडे पाहिल तर त्याच्या चेह-याचा रंग उडाला होता... तो पुढ येत म्हणाला
" स....संजु...कोणाशी बोलतोयस..... काय झालय तुला..."
त्याच्या आवाजात थोडी भिती जाणवत होती. समोर शांतपणे उभ्या गौरीकडे हात करत मी म्हणालो... " कोणाशी काय, गौरी सोबत बोलतोय..."
तसा भाऊ माझ्या जवळ येऊन शांतपणे म्हणाला...
"संजु .. तुला भास होतोय, ती इथ नाही... ती आलेली नाही आणि कधी येणारही नाही...."
मला भावाच्या बोलण्यान हसु फुटल..हसतच मी म्हणालो...." ये गौरी............ह्याला बघ चश्मा लागलाय.........तु दिसत नाहीस याला.."
अस म्हणत मी गौरीचा हात आपल्या हाती घेऊ लागलो तस काळजात चर्रर्रर्रर्रर्र कन झालं ... सर्वांग शहारल...
तीचा हात माझ्या हातात येत नव्हता......
ती जवळ होती पन स्पर्श करता येत नव्हता.
तीला स्पर्श करताना माझा हात हवेतच फिरत होता..
शब्दही आता थरथरत होते...
"ग.................ग...... गौरी............."
माझ्या वागण्याचा भावाला खूप राग आला तसा माझ्यावर रागावत तो जोरात ओरडला....."मेली तुझी गौरी...हालहाल करून ठार मारल तीला त्यानी..."
भावाचे शब्द कानावर पडताच अंगावर सर्रर्रर्रर्रर्र कन काटा आला, कोणीतरी गरम गरम वितळलेल शिस कानात ओताव अस वाटल... शरीरातून प्राण निघून गेल्या सारखा मी खालीच बसलो... समोर ऊभ्या गौरी कडे पहाताच माझे डोळे भरून आले, तसे माझ्याकडे पहात तीचेही डोळे पाणावले, तीच्या नजरेत असह्य यातना दिसत होत्या... 

भाऊ आपल डोक दोन्हा हातानी पकडून खाली बसला आणि ढसाढसा रडत मला सांगु लागला...
" तुझ्यावर खुप जिव होता तीचा... पन ती देवदासीची मुलगी म्हणून बाबाना तुमच लग्न होऊ द्यायच नव्हत. "
....... हूंदका आवरत भाऊ पुन्हा बोलु लागला..
" तीची दाहवीतूनच शाळा बंद करून गावच्या प्रथेनुसार तीलाही लोकानी जबरदस्ती देवदासी बनवल..खुप रडली..ओरडली... उपाशी राहीली... पन शेवटी नाईलाजान घरोघरी जोगवा मागु लागली.
सावकाराच पोरग येता जाता तीची छेड काढायच...'हीला मीच कुस्करणार ' अस चारचौघात ओरडायचा, ती या रोजच्या त्रासाला वैतागली होती. एक दीवस तीन चारचौघातच त्याच्या मुस्काटात हाणली. आणि पुन्हा नादाला लागु नको म्हणून दम भरला..."
डोळ्यातील अश्रु पुसत भाऊ माझ्याकडे पहात पुन्हा बोलु लागला... तशी चालत गौरी माझ्या जवळ बसली...
" चारचौघात गौरीन केलेल्या या अपमानान सावकाराच पोरग जबर चिडल होत. पावसाळ्याच दिवस होते ते...अशीच एक दिवस शेजारच्या गावातुन ती देवीच्या गाण्याचा कार्यक्रम करुन घरी निघालेली..वाटेत सावकाराच पोरग आणि त्याचे दोस्त तीची वाटच बघत बसलेले...तीला बघताच तीच तोंड दाबून जबरदस्तीन पळवून नेल... वर डोंगरत त्याच्या शेतात बांधलेल्या पाल्याच्या छप्परात नेऊन सगळ्यांनी तीच्यावर बलात्कार केला..."
भावाचा एक एक शब्द माझ काळीच चिरत होता.. दगडाला डोक टेकुन मी ऐकू लागलो, डोळ्यातुन एकसारख पाणी वहात होत...
तीला ही गहीवरून आल होत. माझ्या खांद्यावर आपल डोक टेकवून गौरी शांतपने ऐकत तशीच रडत होती..
पुन्हा भाऊ बोलु लागला.." त्या नराधमाच एवढ्यावर समाधान झालं नाही, तीला त्याच ठिकानी बांधून ठेऊन ते परतले आणि ज्यांच्या समोर तीन सावकाराच्या पोराचा अपमान केला त्या आपल्या मित्रांना पन तीच्यावर बलात्कार करायला सांगितल..."
भावाच बोलण ऐकुन कंठ दाटून यायचा...... "तुझ्या गौरीला जीवंत रहाण्यापुरत खायला द्यायचे रे आणि पुन्हा आपली वासना शमवाचे...कुणालाच तीच्या कोवळ्या मनाशी तीच्या भावनाशी काही घेणदेण नव्हत...ती त्यांच्यापैकी कुणाचीच बहिण, मुलगी त्यांच्या मते गावातल्या कुत्र्या मांजरालाही तीच्या शरीराचे लचके तोडायचा अधिकार होता... कारण ती 'देवदासी' होती..."
भावाचा एक एक शब्द माझ काळीज फाडत होता...मोठ्यान ओरडाव, रडाव वाटत होत पन आवंढा गिळून पुन्हा ऐकू लागलो...तसाच हूँदका आवरत भाऊ बोलु लागला...
"गौरी गावातून गायब होऊन दोन तीन आठवडे झाले असतील... ती एका मुलाबरोबर पळुन गेली अशी अफवा त्याच नराधमानी उठवली.. मला संशय आला तसा एक दिवस त्यांचा पाठलाग करत जंगलात गेलो. त्या जागेवर आधीच तीघे चौघे होते. ... ते तीथून जायची वाट पाहत एका झाडामागे लपुन बसलो. सर्वजण तिथुन परत गेले तसा मी त्या झोपडीत गेलो..आणि समोर द्रुष्य बघुन काळजाच्या चिंधड्या चिंधड्या झाल्यासारख वाटल रे......"
म्हणत त्याला हूंदका आवरण कठिन झाल होत...तो ढसाढसा रडु लागला... माझीही तीच अवस्था झालेली...
स्वताला सावरत भाऊ बोलु लागला..
" एखाद्या उमललेल्या फुलासारखी तुझी गौरी निश्तेज, निपचीप पडली होती, पार सुकून गेलेली.. अंगावर कपडे पन नावापुरतेच... तोंडातून किंचीतसा आवाज यायचा... आई......आई........पाणी .......... .....पाणी........ माझी चाहूल लागली तसे हळू हळू डोळे उघडून पाहू लागली... मला बघीतल तस आपल उघड शरीर झाकायचा केवीलवाणा प्रयत्न करु लागली... पन तीला साधा हात ही वर उचलता येत नव्हते... इतक्या यातना सहन करून आता तीच्या डोळ्यातील पाणीही आटल होत...तीच्यापाशी जात बाजुला पडलेल्या कापडाच्या चिंध्यानी तीच थोड शरीर झाकू लागलो... तशी मला म्हणाली, "संजु कसा आहे रे..."
भावाचे शब्द ऐकताच माझ्या काळजाचा बांध फुटल... ढसढसा रडत मी अश्रुना वाट करून दिली...
आपले डोळे पुसत भाऊ सांगु लागला... "मी तीला सोडवणार तोच ते सर्व परत आले... मला ठार मारायची धमकी देत म्हणाले की 'गप गुमान चालाय लागायच हीतन....तुला पन एक बहीन आहे...' हात्यार दाखवून मला तीथून धमकी देऊन घालवल रे.. पुन्हा माझ तिथ जायच धाडस नाही झाल...तुला फोन करून सांगावस वाटल पन काय सांगु, आण कस सांगु... पन मला माहिती आहे एवढ करून त्यांनी गौरीला जीवंत ठेवली नसणार...." बोलत भाऊ माझ्या जवळ येत घरी जाऊया म्हणाला पन मी त्याला परतायला सांगितल...तसा तो परतू लागला,
माझ्या खांद्यावर आपल डोक टेकवून मघापासुन फक्त ऐकणारी गौरी शांतपणे म्हणाली... "तीन आठवड माझ्या शरीराच लचक तोडत व्हती, तुझा भाऊ तिथवर पोहोचला तसे ते घाबरले...
त्या राती म्या आत कण्हत पडलेली.. हळु हळू ते माझ्या भवती वाळलेली लाकड रचत आसल्याच जाणीवल... लाकडाचा खच पडला व्हता... जिते पणीच ते माझी चिता रचत व्हते.... त्यांनी लाकडात आग लावली तसा आगीचा भडका उडाला......पर म्या मनापासुन देवाकड एक प्रार्थना केली 'देवा तुज लय उपकार झालत, आज तुला माजी दया आली र...आज तु ह्या नरकातून मला सोडवस पन संजु ला भेटल्याबिगार मला मुक्ति देऊ नग र देवा.'.. आगीच चटक अंगाला बसत व्हत पर जोरात आरडायची पन ताकत माज्यात नव्हती र... कण्हत कण्हतच मी त्या आगीत होरपळुन राख झाले... .त्यांनी मला जीवंतच जाळली आन परतून गावात गेले...."
गौरीच शब्द ऐकले तसे तीला आपल्या मीठीत घेतल, एका देवदासी ची काही राक्षसानी जीवंत होळी केली होती...
अश्रु पुसत मी खिशातला चाकू काढून गळ्यावर ठेवला आणि खस्स्स्स्स कन ओढणार तोच गौरी शांतपणे म्हणाली... "तुला ठार मारुन आपल करायच असत तर दोन वेळा त्या पिशाच्चा च्या तावडीतन वाचीवल नसत. मरायला हिम्मत लागत न्हाय, दुख पाठीवर टाकुन जगायला हिम्मत लागतीया... तु किडा मुंगीसारख मेलल मला आवडायच न्हाय... एक गौरी मेली म्हणून जग थांबल न्हाय. या देसात आज कितीतरी गौरी देवदाशी बनुन रोज मरत्यात आन मरण भोगत जगत्यात... तुला भेटयलाच जीव तळमळत व्हता... पन आता म्या मुक्त झाले रे.... "
तीच्या बोलण्याने मी स्तब्ध होऊन तीला छातीशी कवटाळले.... तशी ती माझ्या पासुन दूर जात होती... मी तीला साद घालू लागलो. माझ्याकडे पहात म्हणाली..."या जन्मात नाही पन पुढाचा जन्म तुझ्यासाठीच घेईन.." तीने आपले दोन्ही हात पसरले, तिची पांढरट आकृति आकाशात जाता जाता नाहीशी झाली... मी मात्र भरलेल्या अंत:करणाने घरी परतलो...
आज मी माझ्या शहरातल्या घरी निघालोय...येताना कोणाच्या नाही पन गौरीच्या आईच्या पायावर डोक टेकवल...तसे त्यांचे डोळे पाणावले...
आपले दोन्हा हात माझ्यासमोर जोडत त्या म्हणाल्या.. " लेकरा... माजी गौरी कधी शेरात भेटली तर म्या तुझ्यावर रागवली न्हाय म्हणून सांग र..."
गौरीच्या आईने एक चुरघळलेली दहा रूपयांची नोट माझ्या हाती दीली आणि म्हणाल्या..." हे पैस माझ्या लेकीला दे... आन तीला सांग मला रोज तुझी आठवण यतीया... काळजी घे म्हणाव स्वताची .."
त्या माऊलीच बोलण ऐकुन गहीवरुन आल... खाली पहात मान हालवली आणि S.T.त चढलो..
गौरी चा आत्मा मुक्त झाला पण आज गौरीसारख्या हजारों मुली देवदासी प्रथेच्या बळी ठरत आहेत...आज आयुष्याला एक नवी दिशा मिळाली..... गौरीच्या आठवणी मनात साठवुन आता पुढच्या प्रवासाला निघालोय...

No comments:

Post a Comment